[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय महिला अंध क्रिकेट संघाने आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून इतिहास रचला. भारताच्या महिला अंध क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने आयबीएस वर्ल्ड गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले.
भारताच्या महिला अंध क्रिकेट संघाने IBS वर्ल्ड गेम्समध्ये दमदार कामगिरी दाखवली. भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच होता ज्यात त्यांनी ८ गडी राखून विजय मिळवला होता. यानंतर टीम इंडियाने इंग्लंडचा पराभव केला. भारतीय संघाचा तिसरा सामनाही ऑस्ट्रेलियासोबत झाला. त्या सामन्यातही भारताने दणदणीत विजय मिळवला होता.
अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने निर्धारित २० षटकात ८ विकेट्स गमावत ११४ धावा केल्या. मात्र, टीम इंडियाने ३.३ षटकात एका विकेटच्या मोबदल्यात ४३ धावा करत सुवर्णपदक जिंकले. एवढेच नाही तर IBS वर्ल्ड गेम्समध्ये टीम इंडियाला प्रथमच सुवर्णपदक जिंकण्यात यश आले आहे. यापूर्वी भारताच्या महिला अंध संघाला एकदाही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. त्यामुळे भारतीय अंध महिला संघासाठी हा सुवर्णदिन असेल. कारण यापूर्वी भारतीय महिला संघाकडून अशी कामगिरी कधीच झाली नव्हती. त्यामुळे आता या सामन्यानंतर भारतीय महिला अंध संघाकडून अपेक्षा फार वाढलेल्या असतील. या स्पर्धेनंतर जेव्हा भारतीय अंध महिला संघ उतरतील तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टींवर चाहत्यांची नजर असेल. या विजयानंतर त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत, कारण त्यांनी ऑस्ट्रेलियासारख्या दिगज्ज संघाला पराभूत केले आहे. त्यामुळे या सामन्यानंतर ते कशी कामगिरी करतात, याची उत्सुकता सर्वांना असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामान चांगलाच रंगददार झाला. कारण ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत दमदार धावसंख्या उभारली होती. पण भारताने त्यांना कडक उत्तर दिले आणि विजय मिळवला.
[ad_2]