[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतातील क्रिकेटच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे जसप्रीत बुमराह पुन्हा संघात दाखल होणार आहे. तो नेपाळ विरोधात होणाऱ्या मॅचमध्ये टीम इंडियात नसेल. मात्र, सुपर ४ च्या लढतींसाठी टीम इंडियामध्ये तो दाखल झालेला असेल. जसप्रीत बुमराह वैयक्तिक कारणांसाठी भारतात आल्याची माहिती आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळं रद्द झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाल्यानं दोन्ही संघांना एक एक गुण देण्यात आला होता. त्यामुळं पाकिस्तानची टीम सुपर ४ मध्ये पोहोचली आहे. त्यामुळं भारत आणि नेपाळ यांच्यातील लढत महत्त्वाची आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यात उद्या लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रद्द झाल्यानं चाहत्यांची निराशा झाली होती. भारतासाठी उद्याची मॅच महत्त्वाची आहे. मात्र, त्यावर देखील पावसाची छाया आहे. वेदर रिपोर्टनुसार पल्लेकेलेमध्ये सोमवारी सकाळी ६० टक्के पावसाची शक्यता आहे. तर, टॉसच्या दरम्यान ही शक्यता २२ टक्क्यांपर्यंत असू शकते.
मॅच रद्द झाली तर भारताला फायदा
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत रद्द झाल्यानं दोन्ही संघांना एक एक गुण मिळालेला आहे. भारताला नेपाळ विरोधातील लढत जिंकण्याची संधी आहे. जर पावसामुळं उद्याचाही सामना रद्द झाला तर भारताला एक आणि नेपाळला एक गुण मिळेल त्यामुळं भारताचे २ गुण होतील. तर, नेपाळला एक गुण मिळेल. दुसरीकडे पाकिस्तानकडून नेपाळ पराभूत झाल्यानं त्यांना १ गुण मिळालेला असेल. अशावेळी भारत सुपर ४ मध्ये पोहोचू शकतो.
[ad_2]