( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांना 1 मार्चपासून 10 टक्के पाणीकपातीला (Water Cut) सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ 48 टक्के पाणीसाठी शिल्लक असून भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील पाणीसाठा मिळावा अशी मागणी मुंबई महानगरपालिकेने (Mumbai Municipal Corporation) राज्य सरकारकडे पत्राव्दारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास मोठ्या प्रमाणात पाणीकपातीला सामोरे जावं लागणार असल्याची भीती आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महानगरपालिकेने पाणी प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.
अधिक पाहा..