रेल्वे स्थानकातून चोरायच्या सोन्याचे दागिने, पोलिसांनी शेत खोदून पाहिलं असता बसला धक्का, अख्खी गँग अटकेत

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोलिसांनी महिलांच्या एका टोळीला अटक केली आहे. महिलांची ही टोळी रेल्वे स्थानकांवर सोने, चांदीचे दागिने चोरी करत असत. यानंतर त्या शेतामध्ये खड्डा करुन हे सर्व दागिने त्यात लपवत असत. पोलिसांनी तब्बल 12 महिलांना याप्रकरणी अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सर्व महिलांची चौकशी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलांची ही टोळी नागपूरमधील आहे. रेल्वे पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत त्यांचे गुन्हे उघड केले आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की, मध्य प्रदेशात वास्तव्य करत या महिला…

Read More