
मुंबई (pragatbharat.com) : आज १ मे, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. मुंबईतील शिवाजी पार्क आणि हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोठी गर्दी केली असून, या निमित्ताने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्याचे चित्र दिसत आहे.

