भारतीय टपाल विभाग महाभरती २०२६: १० वी पासवर २८,७४० जागांसाठी मेगा भरती सुरू; विना परीक्षा थेट सरकारी नोकरी!

नवी दिल्ली (pragatbharat.com) : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील आणि देशातील लाखो तरुण-तरुणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टपाल विभागाने (India Post) वर्ष २०२६ साठीची ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या अंतर्गत देशभरात तब्बल २८,७४० रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही; केवळ १० वीच्या गुणांच्या टक्केवारीनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.

भरतीचा सविस्तर तपशील आणि पदे: या भरती प्रक्रियेद्वारे खालील तीन प्रमुख पदांची नियुक्ती केली जाणार आहे: १. शाखा पोस्टमास्टर (BPM) २. सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) ३. ग्रामीण डाक सेवक (GDS)

पात्रता आणि अटी:

  • शैक्षणिक पात्रता: उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी उत्तीर्ण (SSC) असावा. दहावीमध्ये गणित, इंग्रजी आणि स्थानिक भाषेचा (मराठी) अनिवार्य विषय म्हणून अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा: उमेदवाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, SC/ST उमेदवारांना ५ वर्षे आणि OBC उमेदवारांना ३ वर्षे वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.
  • इतर: उमेदवाराला संगणकाचे प्राथमिक ज्ञान आणि सायकल चालवता येणे अनिवार्य आहे.

पगार आणि मानधन:

  • BPM (शाखा पोस्टमास्टर): ₹१२,००० ते ₹२९,३८०/- दरमहा.
  • ABPM/GDS: ₹१०,००० ते ₹२४,४७०/- दरमहा.

महत्त्वाच्या तारखा (२०२६ जानेवारी सायकल):

  • ऑनलाइन नोंदणी सुरू: ३१ जानेवारी २०२६
  • अंतिम तारीख: १४ फेब्रुवारी २०२६
  • शुल्क भरण्याची शेवटची तारीख: १६ फेब्रुवारी २०२६

अर्ज कसा करावा? इच्छुक उमेदवारांनी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन प्रथम नोंदणी (Registration) करावी. त्यानंतर अर्ज फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी १०० रुपये शुल्क असून महिला, SC/ST उमेदवारांसाठी अर्ज विनामूल्य आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *