‘आरोपीचा एन्काऊंटर करु नका,’ 2 मुलांची हत्या झाल्यानंतर वडिलांची पोलिसांना विनंती; म्हणाले ‘तुम्ही…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशच्या बदायूँमध्ये दोन मुलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अटकेदरम्यान झालेल्या चकमकीत मुख्य आरोपी साजिदला ठार केलं आहे. दरम्यान मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सह-आरोपी जावेदला चकमकीत ठार करु नका अशी विनंती केली आहे. त्याने आपल्या भावासह मिळून हे निर्घृण कृत्य का केलं? याची माहिती मिळवा असं ते पोलिसांना म्हणाले आहेत.  साजिदने 11 वर्षांचा आयुष आणि 6 वर्षांचा आहान यांची त्यांच्याच घऱात गळा कापून हत्या केली होती. सुदैवाने त्यांचा भाऊ आणि आई या हल्ल्यातून वाचले होते. कुटुंबाने केलेल्या दाव्यानुसार, हत्येनंतर साजिदने जावेदसह घटनास्थळावरुन पळ…

Read More

'जरा पोलिसांना फोन करा,' शेजाऱ्याने केली विनंती, लोकांनी घरात जाऊन पाहिलं असता चक्रावले '4 दिवसांपासून बायको…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्लीत पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर 4 दिवस मृतदेह घरातच ठेवला होता. पतीने 4 दिवसांनी शेजाऱ्यांनाच पोलिसांना फोन करण्यास सांगितलं. पोलिसांनी घऱातून 51 वर्षीय सुनिता यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.   

Read More

‘आमची कळकळीची विनंती आहे की…’; भारतामुळे धाबं दणाणलेल्या मालदीवमधील व्यापाऱ्यांचं पत्र Viral

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Vs Maldives: भारत आणि मालदीवदरम्यानचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप बेटांना भेट दिल्यानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी वाटेल त्या भाषेत भारतीयांबरोबरच पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त विधानं केल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. भारतीयांचा अपमान केल्याने अनेकांनी आपले नियोजित दौरे रद्द केले आहेत. सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवसंदर्भातील अनेक ट्रेण्ड चर्चेत आहेत. अनेकांनी पर्यटन दौरे रद्द केल्याचे, बुकींग रद्द केल्याचे स्क्रीनशॉर्टसही पोस्ट केलेत. मालदीवला जाण्याऐवजी लक्षद्वीपला जा असं म्हणत हजारो भारतीयांनी मालदीवचे दौरा रद्द केला आहे. सर्वाधिक परदेशी पर्यटकांचा विचार केला तर मालदीवसाठी भारत हा…

Read More

‘कृपया सोहळ्याला येऊ नका!’, राम मंदिरासाठी लढा उभारणाऱ्या अडवाणी, एम एम जोशींकडे ट्रस्टची विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी लढा उभारणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात मंदिराच्या अभिषेक सोहळ्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दोन्ही नेते वय आणि आपल्या आरोग्यामुळे हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे.   “दोन्ही नेते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असून त्यांचं वय पाहता न येण्याची विनंती केली आहे. दोन्ही नेत्यांनी ही विनंती स्विकारली आहे,” अशी माहिती राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.  चंपत राय यांनी 22 जानेवारीला अभिषेक सोहळा होणार…

Read More

‘मला एवढं एक काम करु द्या…’, शिवराज सिंग चौहान यांची नव्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com) मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोहन यादव यांची निवड झाल्यानंतर इतकी वर्षं राज्याचं नेतृत्व करणारे शिवराज सिंह चौहान यांनी शेवटच्या पत्रकार परिषदेत आपल्या मनात कोणताही खेद नसल्याचं म्हटलं आहे. तसंच आपण दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे एका गोष्टीसाठी परवानगी मागितली आहे.  मुख्यमंत्रिपदाला रामराम ठोकल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी भोपाळमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्या कार्यकाळातील कामकाज, उपलब्धी, पक्ष नेतृत्व, प्रशासन या सगळ्यांचा उल्लेख केला. यावेळी भावूक झालेल्या शिवराज सिंह चौहान यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडे एक…

Read More

‘परदेशात लग्न करु नका’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारतीयांना विनंती, म्हणाले ‘तुम्ही 5 लाख कोटी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील अनेक श्रीमंत कुटुंब परदेशात लग्न करत असल्याच्या ट्रेंडमुळे आपण फार व्यथित असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना भारतातच लग्न करा, जेणेकरुन आपला पैसा परदेशात जाणार नाही असं आवाहनही केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांशी संवाद साधताना लग्नाची खरेदी करताना ‘मेड इन इंडिया’ वस्तूंनाच प्राधान्य द्या असं आवाहन केलं आहे.  “आता लग्नाचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या हंगामात तब्बल 5 लाख कोटींची उलाढाल होईल असा अंदाज अनेक तज्ज्ञ दर्शवत आहेत. लग्नासाठी खरेदी करताना तुम्ही सर्वांनी फक्त भारतात तयार केलेल्या…

Read More

कोटामधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांनी Super 30 चे आनंद कुमार हादरले, कोचिंग सेंटर्सना केली विनंती, म्हणाले ‘पैशासाठी…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभियंता आणि डॉक्टरांसाठी भारतातील कोचिंग जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमधील कोटा येथे रविवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची बातमी समोर येताच खळबळ उडाली आहे. दरम्यान गणितज्ञ आणि सुपर 30 कोचिंग सेंटरचे संस्थापक आनंद कुमार यांनी यावर व्यक्त होताना या आत्महत्यांनी आपण हादरलो असल्याचं म्हटलं आहे. आनंद कुमार यांनी ट्विटरला आपल्या भावना व्यक्त करताना कोचिंग सेंटर्सना विद्यार्थ्यांना आपल्या मुलांप्रमाणे वागणूक देत, सर्वांकडे लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. तसंच त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षा ही फक्त एक चाचणी असून, तुमच्या कौशल्याचं मोजमाप त्यातून केलं जाऊ शकत नाही…

Read More