नवी दिल्ली : मागील पाच वर्षांत 9 लाख भारतीय नागरिक परदेशात स्थायिक झाले आहे. त्यांनी भारताचे नागरिकत्व सोडले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने संसदेत सांगितले.राज्यसभेत उत्तर देताना परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिं
ह यांनी सांगितले की, 2011 ते 2024 या काळात सुमारे 21 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. 2021 नंतर भारतीय नागरिकत्व सोडणार्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 या महामारीच्या वर्षात हा आकडा सुमारे 85 हजारांपर्यंत खाली आला होता, परंतु त्यानंतरच्या वर्षांमध्ये तो वाढून जवळपास 2 लाखांवर पोहोचला.
ह यांनी सांगितले की, 2011 ते 2024 या काळात सुमारे 21 लाख भारतीयांनी परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे. 2021 नंतर भारतीय नागरिकत्व सोडणार्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2020 या महामारीच्या वर्षात हा आकडा सुमारे 85 हजारांपर्यंत खाली आला होता, परंतु त्यानंतरच्या वर्षांमध्ये तो वाढून जवळपास 2 लाखांवर पोहोचला. 2011 मध्ये 1 लाख 22 हजार 819, 2012 मध्ये 1 लाख 20 हजार 923, 2013 मध्ये 1 लाख 31 हजार 405, 2014 मध्ये 1 लाख 29 हजार 328, 2015 मध्ये 1 लाख 31 हजार 489, 2016 मध्ये 1 लाख 41 हजार 603, 2017 मध्ये 1 लाख 33 हजार 49, 2018 मध्ये 1 लाख 34 हजार 561, 2019 मध्ये 1 लाख 44 हजार 017, 2020 मध्ये 85 हजार 256, 2021 मध्ये 1 लाख 63 हजार 370, 2022 मध्ये 2 लाख 25 हजार 620, 2023 मध्ये 2 लाख 16 हजार 219 तर 2024 मध्ये 2 लाख 06 हजार 378 नागरिकांनी नागरिकत्व सोडले आहे
तर 3 वर्षांत 5 हजार 945 भारतीय मध्य-पूर्वेतून परतले. सुरक्षिततेच्या कारणास्तव या नागरिकांना परदेशातून बाहेर काढण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लोकसभेत सांगितले की, यात इस्रायलमधून ‘ऑपरेशन अजय’ आणि इराण-इस्रायलमधून ‘ऑपरेशन सिंधू’ यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त, कुवेत आगीत मृत्युमुखी पडलेल्या 45 भारतीयांचे मृतदेहही भारतात आणण्यात आले.
