Virat Kohli Shares Emotional Post With Unforgettable Memory of Him and Rahul Dravid; ‘कधी वाटलंही नव्हतं… विराट कोहलीची राहुल द्रविड यांच्यासाठी इमोशनल पोस्ट; नेमकं झालं तरी काय?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

रोसीयू (डॉमिनिका): भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून १२ जुलैपासून पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ तब्बल दोन महिने वेस्ट इंडिज दौऱ्यावर असेल. २०१७ नंतर विंडसर पार्क येथे होणारी ही पहिली कसोटी असेल आणि एकूण पाचवी कसोटी. योगायोगाने डॉमिनिका येथे खेळली गेलेली पहिली कसोटीही भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातच होती. तो सामना जुलै २०११ मध्ये खेळला गेला होता आणि सध्याच्या संघासोबत असलेला विराट कोहली हा त्या भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या कसोटीत राहुल द्रविड देखील खेळले होते जे आज टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.

स्टेडियममध्ये द्रविडसोबतचा फोटो पोस्ट करत विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले की, ‘२०११ मध्ये डॉमिनिका येथे खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत फक्त दोनच जण सहभागी झाले होते. वेगवेगळ्या भूमिकांसह आणि क्षमतेसह आपण हा दौरा पुन्हा एकदा करू असं कधी वाटलं नव्हतं, मी खूप कृतज्ञ आहे.’

विराट का झाला भावूक?

शेवटच्या वेळी भारताने डॉमिनिका येथे कसोटी सामना खेळला तेव्हा विराट कोहली आणि राहुल द्रविड हे संघ सहकारी म्हणून प्लेइंग इलेव्हनचा भाग होते, आज मुख्य प्रशिक्षक आणि माजी कर्णधार आणि खेळाडू म्हणून वेस्ट इंडिजविरुद्ध या मैदानात असतील. हा क्षण खरोखरचं वेगळा आहे.

दोन्ही खेळाडू त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या विरुद्ध टोकाला होते. राहुल द्रविड आणि त्यांचा दीर्घकाळचा साथीदार व्हीव्हीएस लक्ष्मण यांची शानदार कारकीर्द वेस्ट इंडिजमधील शेवटच्या कसोटीत संपुष्टात आली. दुसरीकडे विराट कोहलीने मालिकेतील पहिल्याच सामन्यात कसोटी पदार्पण केले. माजी अष्टपैलू डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली आणि इशांत शर्माच्या पाच विकेट्सच्या जोरावर त्यांना २०४ धावांत गुंडाळले. कर्णधार एमएस धोनीच्या १३३ चेंडूत ७४ धावांच्या जोरावर भारताने ३४७ धावा केल्या.

विराट मॅम भी बोल दे, विराट कोहलीनं पापाराझीची घेतली मजा

महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आणि कर्क एडवर्ड्स यांच्या शतकांमुळे वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात ३२२ धावा केल्या आणि शेवटच्या दिवशी केवळ एका सत्रात भारतासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले. यजमानांनी भारताला सहज सामना जिंकू दिला नाही आणि सामना अनिर्णित राहिला. भारताच्या पहिल्या डावात द्रविड पाच धावा करून सॅमीच्या गोलंदाजीवर बाद झाले आणि दुसऱ्या डावात ते ३४ धावांवर नाबाद राहिले. कोहलीने पहिल्या डावात ३० धावा केल्या आणि दुसऱ्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

[ad_2]

Related posts