Know Which Big Mistake Rohit Sharma Will Correct In The 2nd IND vs WI ODI ; दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा मोठी चूक सुधारणार, टीम इंडियामध्ये कोणते बदल केले जाणार पाहा…



( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारताने पहिल्या वनडेत कुंथत-कुंथत विजय मिळवला. कारण रोहित शर्माकडून या सामन्यात एकामागून एक चुका होत राहिल्या. त्यामुळे आता दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित आपल्या चुका सुधारण्यावर भर देणार आहे. दुसऱ्या वनडेत आता भारतीय संघात मोठे बदल होणार आहेत.

दुसऱ्या वनडेत गोलंदाजांनी आपले काम चोख केले होते. कारण त्यांनी ११४ धावांत वेस्ट इंडिजचा डाव गुंडाळला होता. यावेळीही रोहितच्या हातून काही चुका झाल्या. रोहितने यावेळी रवींद्र जडेजाला गोलंदाजी देण्यापूर्वी कुलदीप यादवला संधी द्यायला हवी होती. कारण कुलदीप हा एक चायनामन गोलंदाज आहे. त्याची गोलंदाजी समजणं हे सोपं नाही. त्यामुळे जडेजापूर्वी जर कुलदीपला संधी दिली असती तर कदाचित आणखी कमी धावांत वेस्ट इंडिजचा डाव आटोपला असता. रोहितने यावेळी फलंदजाीमध्ये मोठ्या चुका केल्या. रोहितने यावेळी आपल्या सलामीच्या जागी इशान किशनला संधी दिली. रोहित हा एक अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे संघाची सुरुवात करताना एक अनुभवी खेळाडू मैदानात असायला हवा. जर इशानला सलामीला पाठवायचे होते तर शुभमन गिलला तिसऱ्या किंवा चौथ्य स्थानावर फलंदाजीला पाठवले जाऊ शकले असते. पण ते रोहितने केले नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहली हा चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याची जागा बदलण्यात कोणताच अर्थ नव्हता. पण भारताच्या संघ व्यवस्थापनाने हा मोठा निर्णय़ घेतला. त्यानंतर भारताच्या पाच विकेट्सही गेल्या, पण तरीही कोहलीला मात्र फलंदाजीला पाठवले नाही. ही रोहित शर्माची मोठी चूक होती. रोहितला आपल्या जागी कोहलीला फलंदाजीला पाठवता येऊ शकले असते, पण रोहितने तसे केले नाही. त्यामुळे या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे ही रोहितची सर्वात मोठी चूक होती. त्यामुळे रोहित शर्मा ही चुक दुसऱ्या सामन्यात बदलेल, अशी आशा आहे.

धोनीला वाढदिवसानिमित्त आंध्र प्रदेशच्या चाहत्यांचे खास गिफ्ट; उभारला 41 फुटांचा कटआऊट

रोहित शर्माने जर दुसऱ्या वनडेत चुका सुधारल्या तर भारताला वनडे मालिका वियही मिळवता येऊ शकतो.

Related posts