Why Rohit Sharma And Virat Kohli Left Out From Team India ; रोहित आणि विराटला दुसऱ्या वनडेमधून संघाबाहेर का केले, खरं कारण ऐकाल तर बसेल मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बार्बाडोस : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना दुसऱ्या वनडे लढतीमधून संघाबाहेर करण्यात आले. या आजी-माजी कर्णधारांना संघाबाहेर का करण्यात आले, याचे कारण आता समोर आले आहे. पण जर खरं कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हालाही धक्का बसेल.

दुसऱ्या वनडे सामन्याच्या टॉससाठी जेव्हा हार्दिक पंड्या आला तेव्हा रोहित या सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. पण त्यानंतर हार्दिकने या सामन्यात विकाट कोहलीही खेळणार नसल्याचे सांगितले आणि सर्वांनाच मोठा धक्का बसला. कारण रोहित आणि विराट हे आजी-माजी कर्णधार तर आहेत, पण हे दोघे भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा आहेत. कारण या दोघांना क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे हे दोघे खेळणार नसल्याचे समजल्यावर चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण रोहित आणि कोहली यांना या सामन्यासाठी का वगळण्यात आले, याचे कारण आता समोर आले आहे.

दुसऱ्या वनडेच्या टॉससाठी राहुल द्रविड आणि हार्दिक पंड्या मैदानात आले. टॉसच्या ठिकाणी हार्दिक आला. टॉस झाल्यावर हार्दिकने रोहित आणि विराट का खेळत नाहीत, या गोष्टीचे खरे कारण सांगितले. हार्दिक म्हणाला की, ” दुसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण गेले काही दिवस बरेच क्रिकेट ते खेळले आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंना संघात त्यामुळे संधी मिळू शकते. त्यामुळे रोहित आणि कोहली यांना या दुसऱ्या सामन्यासाठी संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.” भारतीय संघ आतापर्यंत जास्त क्रिकेट खेळलेला नाही. विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतर भारतीय संघाला चांंगलीच विश्रांती मिळाली होती. त्यानंतर आता फक्त दोन कसोटी आणि एक वनडे सामना झाला आहे. त्यामुळे अतिक्रिकेट हा मुद्दा रोहित आणि कोहली यांना विश्रांती देण्यासाठी रास्त ठरू शकत नाही, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

रोहित आणि कोहली यांना न खेळवण्याचा निर्णय भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे. पण याचा किती फटका संघाला बसतो, हे पाहावे लागेल.

[ad_2]

Related posts