IND vs WI T20 Match Updated Timing ; भारत आणि वेस्ट इंडिजचा टी-२० सामना नेमका किती वाजता सुरु होणार, जाणून घ्या योग्य वेळ…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

त्रिनिदाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेला आता सुरुवात होणार आहे. पण या टी-२० सामन्यांच्या वेळा मात्र बदलल्या आहेत. याबाबतचे अपडेट्स आता समोर आले आहेत.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेतील सामने हे संध्याकाळी ७.०० वाजता सुरु व्हायचे. पण या वेळेला मात्र टी-२० सामने सुरु होणार नाहीत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच टी-२० सामने होणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना हा ३ ऑगस्टला त्रिनिदादमध्ये होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघ हो प्रोव्हिडन्स येथे जातील. यावेळी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल दसरा टी-२० सामना हा ६ ऑगस्टला रंगणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा ८ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. हा सामनादेखील प्रोव्हिडन्सच्या मैदानात रंगणार आहे. या तीन टी-२० सामन्यांनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ अमेरिकेत जाणार आहेत. भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-२० सामना हा १२ ऑगस्ट या दिवशी रंगणार आहे. पण त्यानंतर होणाऱ्या पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यासाठी एका दिवसाची विश्रांती नसणार आहे. कारण हा पाचवा टी-२० सामना हा लगेचच १३ ऑगस्ट या दिवशी खेळवण्यात येणार आहे. पण या पाचही सामन्यांच्या वेळा मात्र सारख्याच असणार आहेत.

या टी-२० सामन्यांसाठी टॉस संध्याकाळी ७.३० वाजता होणार आहे. टॉसनंतर दोन्ही कर्णधार आपले संघ जाहीर करतील आणि काही काळ मैदानात सराव करतील. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच रात्री ८.०० वाजता टी-२० सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे हे टी-२० सामने भारतीय वेळेनुसार मध्य रात्रीपर्यंत चालतील. त्यामुळे चाहत्यांना हे सामने पूर्ण पाहता येतील. कारण वनडे सामने त्यांना संपूर्ण पाहता आले नव्हते.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारत आण वेस्ट इंडिज यांच्यातील पाच टी-२० सामन्यांची मालिका चांगलीच रंगतदार ठरेल. कारण वेस्ट इंडिजने मालिकेसाठी तगडा संघ निवडला आहे.

[ad_2]

Related posts