IND Vs NEP: असे चालू राहिले तर नेपाळविरुद्ध होईल पराभव; श्रेयस, विराट, ईशानने पाहा केले तरी काय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पल्लिकल: आशिया कप २०२३ मध्ये भारताची लढत नेपाळविरुद्ध सुरू आहे. या लढतीत कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध झाली होती, पण ही लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती. गेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पण नंतर पावसामुळे गोलंदाजी करता आली नव्हती. आता रोहितने गोलंदाजांना संधी मिळावी म्हणून टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताने आशिया कप सुरू होण्याआधी अखेरची वनडे एक महिन्यापूर्वी खेळली होती. आयर्लंड दौऱ्यात सर्व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे आशिया कपच्या आधी भारताला फिल्डिंग करण्याची संधीच मिळाली नाही. आता दुसऱ्या लढतीत जेव्हा खेळाडू मैदानात उतरले तेव्हा त्यांच्याकडून गंभीर चुका झाल्या.

पहिल्या ओव्हरमध्ये नेपाळचा सलामीवीर कुशल भुरटेल याचा सोपा कॅच सोडला. भारताकडून पहिली ओव्हर मोहम्मद शमीने टाकली होती. शमीच्या चेंडूवर श्रेयस अय्यरने अगदी सोपा कॅच सोडला. पहिल्या ओव्हरमधील ही चूक झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर नेपाळला आणखी एक जीवनदान मिळाले. मोहम्मद सिराजच्या चेंडूवर आसिफ शेखने शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू मारला, जो विराटच्या हातात गेला. पण विराटकडून देखील अय्यर सारखी चूक पुन्हा झाली. अगदी सोपा कॅच विराटकडून सुटला. विराटची ओळख एक चांगला फिल्डर होते. त्यामुळे त्याच्यकडून कॅच सुटल्याने सर्वांना धक्का बसला. स्वत: विराटच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.

दोन कॅच सुटल्यानंतर भारतीय खेळाडू थोडे सीरिअर होतील असे वाटले होते. पण तसे झाले नाही. पाचव्या षटकात विकेटकीपर ईशान किशनने देखील कॅच सोडला. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर भरतेलच्या बॅटला लागून चेंडू लेग साइडला गेला, कॅचची संधी असताना चेंडू ईशानच्या हाताच्या मधून गेला आणि नेपाळला चौकार मिळाला. या प्रकारानंतर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती.

[ad_2]

Related posts