संघ निवडताना इतकी मोठी चूक केल्यानंतर भारत वर्ल्डकप जिंकणार तरी कसा? कच्चे दुवे ठरणार डोकेदुखी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. हा संघ त्या १७ खेळाडूंमधून निवडण्यात आला आहे जो सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत आहे. प्रसिद्ध कृष्णा आणि तिलक वर्मा हे दोन खेळाडू वगळता अन्य सर्वजण जुने आहेत.

वर्ल्डकपची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी होईल आणि भारताची पहिली मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. संघ निवडीनंतर चर्चा सुरू झाली आहे. त्यात दीपक चाहर आणि संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना वगळण्यात आल्याने अश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशाच वर्ल्डकपसाठी निवडण्यात आलेल्या संघात दोन मोठ्या चूका झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारतासारख्या देशात अधिकतर खेळपट्टी या फिरकी गोलंदाजांसाठी मदत करणाऱ्या असतात असे असताना संघात एकाही लेग स्पिनर किंवा ऑफ स्पिनरचा समावेश करण्यात आलेला नाही. भारतीय संघात पाच जलद गोलंदाज आहेत पण एकही लेफ्ट आर्म पेसर नाही.

एकाही ऑफ किंवा लेग स्पिनरला स्थान नाही

वर्ल्डकपमधील सामने भारतातील १० वेगवेगळ्या शहरात होणार आहेत. जेथे अधिकतर फिरकीपटूंना मदत मिळते. १७ जणांच्या जणांच्या संघात फक्त ३ फिरकीपटू आहेत. हे तिघेही डाव्या हाताने गोलंदाजी करता. रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल स्लो ऑर्थोडॉक्स गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव चायनामॅन म्हणजे मनगटाने चेंडू वळवतो.

वर्ल्डकपसाठी संघात निवड झाली अन् दुसऱ्या क्षणाला स्फोटक खेळाडूने जाहीर केली निवृत्ती
तोटा काय

लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांना संघात स्थान मिळाले नाही. त्याच बरोबर वॉशिंग्टन सुंदरच्या नावाचा देखील विचार झाला नाही. जो गोलंदाजीसोबत फलंदाजी देखील करतो. ही गोष्ट सर्वांना माहिती आहे की ऑफ स्पिनर्स विरुद्ध डावखुऱ्या फलंदाजांना त्रास होतो. पाकिस्तानमध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांनी भरलेली आहे. श्रीलंका आणि बांगलादेशमध्येही डाव्या हाताचे फलंदाज भरपूर आहेत. अशा परिस्थितीत हे खेळाडू जडेजा-अक्षर विरुद्ध सहज खेळू शकतील.

निवड न झालेल्या खेळाडूंची चर्चा अधिक; चांगली कामगिरी, दमदार रेकॉर्ड तरी नशिबाने दिला दगा
पाच जलद गोलंदाजांमध्ये एकही डावखुरा नाही

भारतीय संघात ३ जलद गोलंदाज आणि २ जलद गोलंदाजी करणारे ऑलराउंडर्स आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे जलद गोलंदाजी संभाळतील. तर शार्दुल ठाकूर आणि हार्दिक पंड्या हे ऑलराउंडर पर्याय असतील. मात्र संघात एकही डावखुरा जलद गोलंदाज नाही. संघ व्यवस्थापन इतक्या वर्षात एकही डावखुरा जलद गोलंदाज का तयार करू शकला नाही. अर्शदीप सिंगला टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळवण्यात आले पण वनडे फॉर्मेटपासून दूर ठेवले गेले. असे नाही की भारताकडे डावखुरे जलद गोलंदाज नाहीत. खलील अहमद, टी नटराजन, चेतन साकरिया यांनी आयपीएलसह देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे, मात्र त्यांना प्रोत्सहान दिले गेले नाही.

तोटा काय

डाव्या हाताने जलद गोलंदाजी करणारे संघासाठी नेहमीच फायद्याचे ठरतात. ते प्रतिस्पर्धी संघाच्या टॉप ऑर्डरला बाद करू करण्यात यशस्वी होतात. भारताचे उदाहरण घ्यायचे झाले तर रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुभमन गिल यांना नेहमीच अशा गोलंदाजांचा त्रास होतो. संघात असा गोलंदाज नसल्याने भारतीय फलंदाज अशा गोलंदाजीचा फार सराव देखील करू शकणार नाहीत. पाकिस्तानकडे शाहीन शाह आफ्रीदी, ऑस्ट्रेलियाकडे मिचेल स्टार्क आणि बांगलादेशकडे मुस्तफिजुर रहमान हे गोलंदाज आहेत.

[ad_2]

Related posts