Tilak Varma Scores 19 Runs in Alzari Joseph Over IND vs WI 5th T20I; २० वर्षाचा तिलक वर्मा विंडीजच्या राकट ६ फुटाच्या गोलंदाजावर पडला भारी, एका ओव्हरमध्ये कुटल्या १९ धावा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

फ्लोरिडा : वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना सुरु आहे. या मोठ्या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या डावाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पण चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या युवा स्फोटक फलंदाज तिलक वर्माने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली. या सामन्यात त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्याने एकाच षटकात वेस्ट इंडिजचा भयानक वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफची झोपच उडवली. त्याने जोसेफच्या गोलंदाजीवर शानदार फटकेबाजी केली.

एकाच षटकात १९ धावा

भारतीय क्रिकेट संघाच्या डावातील पॉवरप्लेचे सहावे षटक अल्झारी जोसेफ टाकत होता. त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर तिलक वर्मा स्ट्राइकवर होता. षटकाच्या पहिल्या चेंडूवर एकही धाव आली नाही. कदाचित तिलकला हे काही पटले नाही आणि त्यानंतर त्याने अल्झारीला संपूर्ण षटकात झोडपून काढला.

आता क्रिकेटमध्येही येणार ‘रेड कार्ड’, या मोठ्या चुकीसाठी खेळाडूला मैदानाबाहेर जावे लागणार
तिलकने दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारून जोसेफला धक्का दिला. फक्त एक २० वर्षांचा तिलक मैदानात उंच आणि धाकड वेगवान गोलंदाजाची शाळा घेत होता. तिलकच्या या निर्भय रूपाने सर्वांची मने जिंकली. षटकातील शेवटचा चेंडू त्याने एकेरी घेत स्ट्राईक राखला. तिलकने त्या षटकात अल्झारी जोसेफला १९ धावा ठोकल्या.

WI vs IND: निर्णायक टी-२० सामन्यासाठी टीम इंडियाचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी
तिलक झाला बाद

या मालिकेत तिलक वर्मा सतत स्वत:ला सिद्ध करत आहेत. या सामन्यातही त्याने चांगली सुरुवात केली. मात्र त्याचे मोठ्या डावात रूपांतर त्याला करता आले नाही. वर्मा १५० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना १८ चेंडूत २७ धावा करून बाद झाला. या खेळीत त्याच्या बॅटने ३ चौकार आणि २ षटकार मारले. मात्र, रोस्टन चेसने वर्माला बाद करत अप्रतिम झेल घेतला.

अक्षर-चहल टीम इंडियासाठी ठरले महागडे, आज मालिका जिंकण्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार?
भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ विकेट्स गमावत १६५ धावा केल्या. वेस्ट इंडिजला विजयासाठी भारताने १६६ धावांचे लक्ष्य दिले आहे. भारताकडून सर्वाधिक ६१ धावांची खेळी सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून पाहायला मिळाली.

[ad_2]

Related posts