[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Samruddhi Mahamarg Potholes : मृत्यूचा सापळा ठरत असलेला समृद्धी महामार्ग (Samruddhi Expressway) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा (Potholes) पडल्याची मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे लोहोगाव पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या महामार्गालाच भगदाड पडल्याने समृद्धी महामार्गांच्या कामावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
समृद्धी महामार्गांवर जीवघेणा खड्डा
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले. त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते. तेव्हा पुलाचा काही भाग कोसळला मात्र, सुदैवाने जीवितहानी टळली.
पुलावरील खड्ड्यांमुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
पाहा व्हिडीओ : Amravati Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा
अधिक पाहा..
[ad_2]