[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार असलेला हार्दिक पंड्या आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणारा शुभमन गिल यांना आगामी आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक पाहता १८ ऑगस्टपासून आयर्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. बीसीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली. पंड्या हा भारताच्या एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि अष्टपैलू असल्याने तो संघामध्ये समतोल राखतो.
हार्दिक आणि गिल का विश्रांती घेणार?
संघ व्यवस्थापन आणि राष्ट्रीय निवड समिती त्यांना फिट ठेवू पाहत आहे. बोर्डाच्या एका सूत्राने सांगितले की, “अद्याप काहीही निश्चित झालेले नाही आणि एकदिवसीय आणि टी-२० नंतर हार्दिकला कसे वाटते यावर देखील ते अवलंबून असेल. या दौऱ्यादरम्यान खूप प्रवास करावा लागणार आहे. फ्लोरिडा ते डब्लिन असा प्रवास करण्यापूर्वी तीन दिवसांचा वेळ असेल.”
ते म्हणाले, ‘वर्ल्ड कपच्या दृष्टीने वर्कलोड मॅनेजमेंट आवश्यक आहे. विश्वचषकातही तो उपकर्णधार आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत २७ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. आयर्लंडमध्ये भारत पाच दिवसांमध्ये (१८, २० आणि २३ ऑगस्ट) तीन टी-२० सामने खेळणार आहे. विश्वचषकापूर्वी भारताला आशिया कपही खेळायचा आहे.
कर्णधारपद कोणाला मिळणार?
रोहित शर्मा टी-२० वर्ल्ड कपनंतर या फॉरमॅटमध्ये खेळत नाही. हार्दिक पांड्याला नियमित कर्णधार बनवण्यात आले नसून तो सातत्याने संघाचे नेतृत्व करत आहे. सूर्यकुमार यादव त्याच्यासोबत उपकर्णधाराच्या भूमिकेत असतो. अशा स्थितीत हार्दिकला विश्रांती मिळाल्यास सूर्यकुमार यादव आयर्लंड दौऱ्यावर कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.
[ad_2]