[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
पहिल्या टी-२० सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आपेल काम चोख बजावले होते. कारण वेस्ट इंडिजचा संघ दोनशे धावांपर्यंत मजल मारेल, असे निकोलस पुरन आणि रोवमन पॉवेल खेळत असताना वाटत होते. पण भारताच्या गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले आणि त्यामुळेच भारताला वेस्ट इंडिजच्या संघाला १५० धावांच्या आतमध्येच रोखता आले. भारतीय संघ यावेळी सहजपणे हे आव्हान पूर्ण करेल, असे वाटत होते. पण पहिल्या दोन षटकांमध्येच वेस्ट इंडिजने भारतावर दडपण आणले. त्यामुळे भारताचे दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाले. त्यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन यांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. पण भारताला काही विजय मिळवता आला नाही. पण या पराभवानं तर आता एक मोठा धक्का भारतीय संघाला बसला आहे.
सामना संपल्यावर ही गोष्ट समोर आली. कारण मॅचनंतर सामनाधिकाऱ्यांनी भारताचा कर्णधार हार्दिक पंड्याला त्याच्याकडून घडलेली चूक सांगितली. त्यानंतर हार्दिकने ही चूक मान्य केली आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली या पहिल्या टी- २० सामन्यात भारतीय संघाला निर्धारीत वेळेत आपली षटके पूर्ण करता आली नाही. निर्धारीत वेळेत भारताची १९ षटके झाली. त्यामुळे भारताला २० व्या षटकात मोठा फटका बसला. कारण भारताचे पाच खेळाडू यावेळी ३० यार्डाच्या वर्तुळात होते. त्यामुळे तेव्हाच भारताकडून ही चूक घडली हे समजले होते. या चुकीसाठी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूच्या मानधनातून ५ टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात आली आहे. यापुढे जर चुक घडील तर ही रक्कम मानधनाच्या ५० टक्केही होऊ शकते. त्यामुळे यापुढे जर पुन्हा ही चुक झाली तर काय करायचे, हा प्रश्न आता हार्दिकला पडला असेल.
भारताबरोबर वेस्ट इंडिजच्या संघाचीही अशीच चूक या सामन्यात झाली आहे. वेस्ट इंडिजने २ षटके उशिरा टाकली, त्यामुळे त्यांच्या मानधनातून १० टक्के रक्कम वजा करण्यात आली आहे.
[ad_2]