[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>मुंबईतल्या हवामानात अचानक झालेल्या बदलांचा परिणाम आता मुंबईकरांच्या आरोग्यावर झाला आहे. सर्वसामान्य मुंबईकर सर्दी, खोकला, घसादुखी आणि सौम्य ताप या वैद्यकीय तक्रारी घेऊन येत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळं या नागरिकांना मास्क वापरण्याचा आणि थंड पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. गेल्या सात दिवसांत मुंबईच्या वातावरणात बरेच बदल आणि तापमानात चढउताराची नोंद झालीय. वातावरणात वेगानं होणाऱ्या या बदलांचा मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. मुंबईत वातावरण दिवसा उष्ण आणि रात्री किंचित थंडी असते. यामध्ये विषाणूजन्य ताप येण्याची शक्यता वाढते, असं वैद्यकीय तज्ज्ञांचं मत आहे.</p>
[ad_2]
Maharashtra Weather change : हवामानात बदलाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम, तापाच्या रुग्णात वाढ
![](https://pragatbharat.com/wp-content/uploads/2024/01/9ca801347eaca4a5736874fc8d7b65711705372260487541_original.jpg)