आधी म्हणाले प्रचार करणार नाही?, आता पेढे घेऊन दानवे थेट खैरेंच्या घरी पोहचले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha Election : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात सुरू असलेला वाद अखेर संपला आहे. कारण अंबादास दानवे काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे यांच्या संभाजीनगरमधील डेक्कन निवासस्थानी पोहोचले असून, खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपला असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खैरे असा वाद पाहायला मिळत होता. दोन्ही नेते लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात आपण पक्षाचं काम करू, खैरे यांचे काम करणार नसल्याचं दानवे म्हणाले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद कायम असल्याचे बोलले जात होते. मात्र, आज अंबादास दानवे यांनी खैरेंची भेट घेत त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी दानवेंनी खैरे यांना शाल आणि बुके भेट देऊन पेढाही भरवला. त्यामुळे किमान लोकसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांमधील वाद संपला असल्याचं पाहायला मिळत आहे.

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts