Umpire Nitin Menon Said Team India Star Players Always Create Pressure; भारतीय अंपायरनेच केली टीम इंडियाच्या खेळाडूंची पोलखोल; म्हणाले- ‘ते दबाव निर्माण करतात…’

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सलग दुसऱ्या मोठ्या पराभवानंतर भारतीय संघ सध्या विश्रांती करत आहे. जून महिन्यात भारतीय संघ संपून विश्रांतीवर असेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुढील महिन्यात म्हणजे जुलैमध्ये वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. जिथे भारत २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. पण तत्पूर्वी भारतीय संघावर भारतातील अंपायर नितीन मेनन यांनी मोठा आरोप केला आहे.टीम इंडिया अपील करण्यात कुठलीही कसर सोडत नाही, हे सगळ्यांनाच माहीत आहे. सिराजपासून विराट कोहलीपर्यंत सगळेच जोरदार अपील करतात, त्यामुळे कुठेतरी पंचांवर दबाव येतो. अशा परिस्थितीत आता भारताच्या पंचांनी टीम इंडियाच्या खेळाडूंबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

विराटचा मेलबर्नमध्ये वाढदिवस साजरा, खास केक कापून केलं सिलेब्रेशन

नितीन मेनन यांचा भारतीय खेळाडूंवर आरोप

भारतीय पंच नितीन मेनन हे गेल्या काही वर्षांत आपल्या उत्कृष्ट अंपायरिंगमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. ते आयसीसी एलिट पॅनेलचा भाग आहेत. इतकंच नाही तर ते ऍशेसमध्येही कामगिरी बजावणार आहे. मात्र, मेनन यांनी असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. टीम इंडियाचे स्टार खेळाडू आपल्यावर निर्णयासाठी दबाव टाकतात, असा खुलासा त्यांनी केला आहे.

नितीन मेनन पीटीआयला म्हणाले, ‘टीम इंडिया जेव्हा भारतात खेळते तेव्हा खूप हाईप होते, भारतीय संघातील अनेक मोठे खेळाडू नेहमीच आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात, ते ५०-५० निर्णय त्यांच्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतात. पण जर त्या दबावाच्या परिस्थितीत आम्ही नियंत्रणात आहोत, तर ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत याकडे आम्ही लक्ष देत नाही. नितीन मेनन हे मूळचे मध्य प्रदेशचे आहेत आणि त्यांनी जून २०२० पासून १५ कसोटी, २४ एकदिवसीय आणि २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केले आहे.

[ad_2]

Related posts