Sunil Gavaskar Slams BCCI On Sarfaraz Khan Not Selected In Indian Team ; सुनील गावस्करांची बीसीसीआयवर जोरदार टीका

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारताचा कसोटी संघ निवडताना विचारात घेतली जाणार नसेल, तर ही स्पर्धा खेळवता कशाला अशी विचारणा दिग्गज सलामीवीर सुनील गावस्कर यांनी केली. गेल्या तीन मोसमात सातत्याने शंभरच्या सरासरीने धावा करीत असलेल्या सर्फराज खानची निवड न झाल्याने गावस्कर यांनी टीका केली आहे.भारतीय कसोटी संघाची निवड करताना रणजी करंडक स्पर्धेऐवजी आयपीएलमधील कामगिरीस प्राधान्य देण्यात आल्यामुळे गावस्कर नाराज आहेत. “सर्फराज खानने गेल्या तीन मोसमात शंभरच्या सरासरीने रणजी स्पर्धेत धावा केल्या आहेत. भारतीय कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी एखाद्या खेळाडूने यापेक्षा अधिक काय करायला हवे. कदाचीत त्याला अंतिम संघात स्थान देणे शक्य होणार नाही. त्याची संघात निवड करायला काय हरकत आहे,” अशी विचारणा गावस्कर यांनी केली.

कसोटी जगज्जेतेपद लढतीतील पराभवासाठी चेतेश्वर पुजाराला बळीचा बकरा केले, अशी टीका गावस्कर यांनी केली. त्याचवेळी पुजाराचे विराट कोहली, रोहित शर्मासारखे समाजमाध्यमांवर लाखो पाठीराखे नाहीत, त्यामुळे त्याला वगळणे चुकीचे आहे, असेही गावस्कर यांनी सांगितले. भारतीय फलंदाजाच्या अपयशासाठी केवळ पुजाराला बळीचा बकरा का करता. तो भारतीय क्रिकेटचा निष्ठावान सेवक आहे. शांतपणे तो त्याचे काम करीत असतो. त्याला वगळले तर समाज माध्यमांवरून कोणीही टीका करणार नाही. त्यामुळेच तर त्याला वगळले. अन्यथा त्याला वगळण्याचे कारण काय हेच उमजत नाही, अशी खंत गावस्कर यांनी व्यक्त केली.

पुजाराला वगळण्याचे कारणच काय. सातत्याने अपयशी ठरत असलेले अन्य फलंदाज संघात कायम आहेत. आता संघनिवडीच्या माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची वेळ निवड समितीच्या अध्यक्षांवर येत नाही. कदाचित त्यामुळेच हे घडत असावे अशी टिप्पणी गावस्कर यांनी केली. पुजाराऐवजी तिसऱ्या क्रमांकावर यशस्वी जयस्वाल खेळण्याची शक्यता आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

पुजारा काऊंटी क्रिकेट खेळत होता. लाल चेंडूंचा सामना कसा करावा हे तो जाणतो. सध्या खेळाडू ३९ किंवा ४० वर्षाचा असतानाही खेळू शकतो. त्यात गैर काहीच नाही. ते तंदुरुस्त आहेत. चपळाईने धावा घेत आहेत. विकेट घेत आहेत, त्यावेळी निवडीच्यावेळी वय किती हा प्रश्न उपस्थित करण्याची काही गरज नाही. अन्य फलंदाजही अपयशी ठरत असताना केवळ एकालाच लक्ष्य करण्यात आले. कसोटी जगज्जेतेपद लढतीत रहाणे वगळता कोणीच धावा केल्या नाहीत. त्यामुळे केवळ पुजाराला का वगळले याचे उत्तर निवड समितीने द्यायलाच हवे, अशी आग्रही मागणी गावस्कर यांनी केली.

[ad_2]

Related posts