शिखर धवन टीम इंडियात परतणार, BCCI करणार भारताच्या टी-२० संघाचा कर्णधार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: एकेकाळी वनडेमध्ये भारताचे नेतृत्त्व करणारा गब्बर म्हणजेच शिखर धवन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. बराच काळ झाला असला तरी त्याला पुन्हा संघात संधी मिळाली नाही. पण आता मात्र BCCI ने त्याला पुन्हा कर्णधारपॅड देणार असल्याचे म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेर असलेला स्टार फलंदाज शिखर धवनवर आता मोठी जबाबदारी आली आहे. बीसीसीआयने सांगितले की, आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये धवन भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

आशियाई खेळ २०२३ चे आयोजन २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान चीनमध्ये होणार आहे. त्याचवेळी, आशियाई खेळांबाबत बीसीसीआयने आधीच सांगितले होते की यात पुरुष आणि महिला क्रिकेट संघ सहभागी होतील. विशेष म्हणजे, यावेळी भारत ५ ऑक्टोबरपासून एकदिवसीय विश्वचषक २०२३ चे आयोजन करणार आहे. अशा स्थितीत भारताचे प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळतील. यामुळे बीसीसीआयने २०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत ब संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तर महिला क्रिकेटमधील आघाडीचा संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जाणार आहे. त्याचबरोबर या दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मणला भारतीय संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

शिखर धवनची टी-२० कारकीर्द

शिखर धवन जरी आंतरराष्ट्रीय संघातून बाहेर असला तरी हा फलंदाज क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. तर धवनने जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. धवनने आतापर्यंत ६८ टी-२० सामन्यांमध्ये २७.९२ च्या सरासरीने १७५९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ११ अर्धशतकेही पाहायला मिळाली आहेत.

IPL 2023 मध्ये केलेल्या धावा

नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२३ मध्ये शिखर धवनने पंजाब किंग्ज संघाची जबाबदारी स्वीकारली. यादरम्यान धवनच्या उत्कृष्ट फलंदाजीचे दृश्यही पाहायला मिळाले. ज्यानंतर हे स्टार फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पुनरागमन करणार असल्याची चर्चा जोर धरून होती. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी धवनची संघात निवड झाली नाही.

प्ले ऑफमध्ये क्वालिफाय न झाल्यानं शिखर धवनची वडिलांनी केली धुलाई

[ad_2]

Related posts