How Rohit Sharma Scored Century in WI vs IND 1st Test Despite Of Bad Form; फॉर्मात नसलेल्या रोहितने केवळ या एका कारणामुळे झळकावले शतक, सामन्यानंतर समोर आली मोठी माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डॉमिनिका: भारतीय चाहत्यांसाठी वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर एक आनंदाची गोष्ट घडली, ती म्हणजे रोहित शर्माचे शतक. बऱ्याच काळापासून भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या बॅटमधून मोठी खेळी आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. अखेरीस त्याने शतकाचा दुष्काळ संपवत वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी अर्धशतके झळकावली होती आणि दुसऱ्या दिवशी हे खेळाडू आपले शतक झळकावतील अशी अपेक्षा होती आणि दोघांनी ते करून दाखवले.

यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत शानदार शतक झळकावले असून तो अद्याप बाद झालेला नाही, तर मोठी बातमी अशी आहे की कर्णधार रोहित शर्मानेही खराब फॉर्ममधून बाहेर पडून आपली क्षमता दाखवली आहे. रोहित शर्माने पहिल्या डावात १०३ धावा केल्या. तसे, रोहितच्या शतकामागील कथा खूपच रंजक आहे.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरुद्ध सराव केला होता आणि तरीही त्याने शतक झळकावले. वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांच्या यूट्यूब व्हिडिओनुसार, रोहितने सामन्यापूर्वी केवळ ३० मिनिटे सराव केला. रोहितने ऑप्शनल सरावा सत्रातही भाग घेतला नाही आणि तो सरावासाठी आला तेव्हा त्याने केवळ अर्धा तास फलंदाजी केली. सामान्यतः असे म्हटले जाते की चांगली खेळी खेळण्यासाठी तुम्हाला नेटवर जास्त वेळ घालवावा लागतो पण रोहितने याच्या उलट केले.

रोहित शर्माचा वेगळाच अंदाज

सहसा रोहित शर्माला आक्रमक पद्धतीने फलंदाजी करायला आवडते. कसोटी क्रिकेटमध्येही षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडण्यात रोहित अग्रेसर आहे, पण डॉमिनिकामध्ये रोहितने वेगळ्या पद्धतीने फलंदाजी केली. रोहित शांत आणि संथपणे खेळत होता. तसे पाहता आऊटफिल्डही संथ होती. रोहित शर्माने २२१ चेंडूत १०३ धावा केल्या, म्हणजे त्याचा स्ट्राईक रेट फक्त ४६ चा होता. तसे पाहता, कसोटीमध्ये या शैलीत फलंदाजी केली जाते, परंतु रोहित नेहमीच यापेक्षा वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करतो.

रोहित शर्माने खेळपट्टीवर पूर्ण वेळ घालवला. मात्र संधी मिळताच त्याने धावा काढण्यास मागेपुढे पाहिले नाही. एकूणच, रोहित शर्माने फक्त मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले, ज्याची फॉर्म नसलेल्या फलंदाजाला सर्वात जास्त गरज असते. आणि त्यामुळेच रोहितने आपल्या चाहत्यांना खुश करत शानदार कामगिरी केली.

मुंबई इंडियन्सच्या प्लेअर्सनी गायलं कैलाश खेरचं गाणं

रोहित शर्मासाठी हे शतक खास का?

वेस्ट इंडिजविरुद्धचे हे शतक रोहित शर्मासाठी खास आहे कारण, रोहित शर्मा खूपच खराब फॉर्ममध्ये होता. आयपीएलमध्ये त्याची बॅट जवळपास शांतच होती. त्याची सरासरी २० पेक्षा कमी होती. त्याच वेळी, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या दोन्ही इनिंगमध्ये रोहितची बॅट शांत राहिली, परिणामी त्याच्या टीकाकारांनी त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली. अनेकांनी रोहितच्या फॉर्मवरून त्याला बोलण्यात कोणतीच कासार सोडली नाही. यावर हरभजन सिंगही भडकला होता की मर्यादेपेक्षा रोहित श्रमावर अनेकजण टीका करत आहेत. मात्र वेस्ट इंडिजमध्ये पोहोचताच रोहितने आपली लय साधली असून डॉमिनिकासारखी शतके यापुढेही पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Related posts