Why India was Declared Winner By Only 2 Runs, Know The Calculation ; भारताला दोन धावांनीच का विजयी घोषित करण्यात आले, जाणून घ्या त्यामागचं समीकरण काय आहे…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

डब्लिन : भारतीय संघाला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले. या सामन्यात आयर्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना १३९ धावा केल्या होत्या. भारतीय संघ १४० धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरला. जेव्हा पावसामुळे खेळ थांबवला तेव्हा भारताची २ बाद ४७ अशी स्थिती होती. पण त्यानंतर भारताला दोन धावांनी विजयी घोषित करण्यात आले, पण यावेळी भारताला दोन धावांनीच का विजयी घोषित केले, याचे समीकरण आता समोर आले आहे.

आयर्लंडचा संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्यांना सात षटकांमध्ये भारातएवढी नक्कीच मजल मारता आली नव्हती. पण अखेरच्या षटकांमध्ये आयर्लंडच्या फलंदाजांनी जोरदार धावा लूटल्या. त्यामुळे आयर्लंडची धावसंख्या ही २० षटकांमध्ये १३९ एवढी झाली आणि त्यावेळी त्यांची षटकांमागे सरासरी होती ती ६.९५ एवढी. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला. भारताने दमदार सुरुवात केली. ६ षटकांमध्ये भारताने एकही विकेट गमावला नव्हता आणि त्यांची बिनबाद ४५ अशी अवस्था होती. त्यावेळी त्यांची षटकामागे धावांची सरासरी होती ती ६.७८. पण त्यानंतर सातव्या षटकात गेम फिरला. कारण या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्मा शून्यावर बाद झाला. तेवव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार सामन्याचा निकाल लागू शकतो, अशी चर्चा सुरु झाली.

सातव्या षटकातील पाच चेंडू टाकले गेले आणि त्यानंतर पंचांनी पावसामुळे सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी भारताची अवस्था ही २ बाद ४७ अशी होती. त्यावेळी डकवर्थ लुईस नियमांनुसार विचार केला, तर सात षटकांमध्ये भारताच्या २ बाद ४६ धावा असल्या असत्या तर ते विजयी ठरले असते. पण सात षटकाला एक चेंडू कमी असताना खेळ थांबवला. त्यामुळे ६.५ षटकांचा जेव्हा खेळ झाला तेव्हा जर भारताची २ बाद ४५ अशी स्थिती असली असती तर सामना बरोबरीत सोडवला गेला असता. पण त्यावेळी भारताच्या २ बाद ४७ धावा होत्या, याचाच अर्थ भारताच्या दोन धावा जास्त होत्या आणि या जास्त असलेल्या दोन धावांमुळेच भारताला विजयी घोषित करण्यात आले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

भारतीय संघाच्या डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावा जास्त होत्या, त्यामुळे त्यांना पहिल्या टी-२० सामन्यात विजयी घोषित करण्यात आले. आता दुसऱ्या सामन्याती उत्सुकता सर्वांना असणार आहे.

[ad_2]

Related posts