Know Reserve Day Rules For India vs Pakistan Asia Cup 2023 Super 4 Match On 10th September ; भारत-पाक सामन्यासाठी असणाऱ्या राखीव दिवसाचे नियम आहेत तरी काय, जाणून घ्या…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपच्या सामन्यात आता राखीव दिवस असणार आहेत. पण या राखीव दिवसाचे नियम नेमके आहेत तरी काय, हे आता समोर आले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील पहिला सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता पावसाचा व्यत्यय आला तरी हा सामना पूर्ण होऊ शकतो. पण जर पहिल्या दिवशी काही षटकांचा सामना झाला तर राखीव दिवशी पुन्हा सामना नव्याने सुरु होणार की नाही, याबाबत आता राखीव दिवसाचे नवीन नियम समोर आले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना १० सप्टेंबरला सुरु होईल. जर या दिवशी पाऊस झाला आणि एकही षटक टाकले गेले नाही, तर दुसऱ्या दिवशी नव्याने सामना सुरु होऊ शकतो. पण जर १० सप्टेंबरला काही षटकांचा खेळ झाला आणि त्यानंतर पाऊस पडला तर पहिल्यांदा डकवर्थ लुईस नियम समोर येतील. त्यानुसार षटके कमी केली जातील आणि जर पहिला डाव झाला असेल तर षटकांबरोबर धावाही कमी होतील. सुरुवातीला ४० षटकांचा खेळ होतो का हे पाहिले जाईल. त्यानंतर प्रत्येकी पाच षटके कमी केली जातील आणि त्याबरोबर टार्गेटही पूर्ण होईल. पण डकवर्थ लुईस नियमांनुसार किमान २० षटकांचा तरी खेळ व्हायला हवा. त्यामुळे हा सामना २० षटकांपेक्षा कमी ओव्हर्सचा होणार नाही. पहिला दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला तर राखीव दिवशी हा सामना खेळवण्यात येईल. पहिल्या दिवशी नेमका जिथे खेळ थांबला होता तिथूनच राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे राखीव दिवशी नव्याने खेळ सुरु होणार नाही किंव पहिल्या दिवशी टॉस झाला आणि त्यानंतर जर खेळ झाला नाही तर दुसऱ्या दिवशी पुन्हा टॉस होणरा नाही, तर टॉसनंतर जो निर्णय घेतला गेला आहे त्यानुसार खेळ सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्याला राखीव असला तरी त्या दिवशी पुन्हा नव्याने खेळ सुरु होणार नाही. त्यामुळे खेळाडूंचा वेळ आणि श्रम यामुळे वाचणार आहेत.

आशिया चषक: भारत व पाकिस्तान यांचा आज सामना

भारत आणि पाकिस्तान सामन्याचा निकाल नेमका काय लागतो, आता हे सर्वात महत्वाचे असेल. कारण आता या सामन्यासाठी राखीव दिवस असल्यामुळे सामन्याचा निकाल लागू शकतो.

[ad_2]

Related posts