New Zealand Have A Stellar Record Against India In ICC Events Having Lost Just One Game Since 1992

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

धरमशाला : भारतीय संघाला आतापर्यंत विश्वचषक सामन्यांमध्ये (India vs New Zealand) न्यूझीलंडविरुद्ध केवळ एकच सामना जिंकता आला आहे. 2019 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्या सेमीफायनलसह गेल्या 20 वर्षातील दुष्काळ संपवून पलटवार करण्याची वेळ आली आहे. भारतीय संघ ज्या लयीत आहे ते पाहता त्यांच्याकडून ही अपेक्षा स्वाभाविक आहे. मात्र, हा सामना धरमशाला येथे असून गोलंदाजांना सपोर्ट केलेल्या खेळपट्टीवर न्यूझीलंडचे गोलंदाज नेहमीच यशस्वी येतात, हेही लक्षात ठेवावे लागेल.

भारतीय फलंदाज न्यूझीलंडचा सामना कसा करतील?

विश्वचषकात भारतीय संघासमोर सर्वात मोठे आव्हान न्यूझीलंड संघाने उभे केले आहे. विश्वचषक संघात समाविष्ट असलेल्या भारतीय संघाच्या टॉप ऑर्डरने न्यूझीलंडविरुद्ध 30 धावांची एकही इनिंग खेळलेली नाही. दोन अर्धशतके झाली असतील तर ती रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्याच्या नावावर आहेत. विश्वचषकात विकेट घेण्याचा विचार केला तरी जडेजा, पांड्या आणि बुमराह यांना प्रत्येकी एकच विकेट मिळाली आहे. 

भारतासाठी एकच आनंदाची बातमी 

या सामन्यात भारतासाठी काही आनंदाची बातमी देखील असू शकते. हा विश्वचषक भारतीय भूमीवर होत आहे. अशा स्थितीत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांवर मात करणे सोपे जाणार नाही. भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहलीने 115 सामन्यांमध्ये 59.4 च्या सरासरीने आणि 97.3 च्या स्ट्राईक रेटने 5762 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 29 अर्धशतके आणि 22 शतकांचा समावेश आहे. 

रोहित शर्माने 84 सामन्यांमध्ये 58.8 च्या सरासरीने आणि 102.3 च्या स्ट्राइक रेटने 4413 धावा केल्या आहेत, ज्यात 20 अर्धशतके आणि 13 शतकांचा समावेश आहे. केएल राहुलने 27 सामन्यांमध्ये 58.9 च्या सरासरीने आणि 90.5 च्या स्ट्राइक रेटने 1119 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये आठ अर्धशतके आणि दोन शतकांचा समावेश आहे.

न्यूझीलंडची गोलंदाजी 

सध्या विश्वचषकात न्यूझीलंडकडे असलेल्या पाच गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना अडचणीत आणले आहे. मॅट हेन्रीने एकाच सामन्यात तीन विकेट्स, मिचेल सँटनरच्या एकाच डावात दोन बळी, ट्रेंट बोल्टच्या एकाच डावात दोन बळी, फर्ग्युसन आणि नीशम यांच्याकडेही प्रत्येकी एक विकेट आहे. आता सामना धरमशालामध्ये असल्याने वेगवान गोलंदाजांना सुरुवातीला चांगली मदत मिळणार आहे. आता भारतीय फलंदाज या गोलंदाजीचा कसा सामना करतात हे पाहायचे आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts