Maiden India Call For Shreyanka Patil In The T20I Series Vs England Harmanpreet Kaur Will Be The Captain While Smriti Mandhana Will Be The Vice Captain

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Womens Cricket Team : भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंडविरुद्ध टी-20 आणि कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत हरमनप्रीत कौर कर्णधार असेल, तर स्मृती मानधना उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. श्रेयंका पाटीलनं टीम इंडियात पर्दापण केलं आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), रिचा घोष, अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका ठाकूर, टी. पूजा वस्त्राकर, कनिका आहुजा आणि मिनू मणी.

भारत-इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक 

भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ डिसेंबरला होणार आहे. यानंतर मालिकेतील शेवटचे दोन सामने अनुक्रमे 9 डिसेंबर आणि 10 डिसेंबर रोजी होणार आहेत. टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 14 डिसेंबरपासून खेळवला जाणार आहे. दुसरी कसोटी 21 डिसेंबरपासून खेळवली जाणार आहे.

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार 

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील पहिला सामना 28 डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर या मालिकेतील दुसरा सामना 30 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 जानेवारीला खेळवला जाईल. मात्र या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

श्रेयंका पाटीलची अ संघाकडून दमदार कामगिरी 

दरम्यान, भारत महिला अ संघाने बुधवारी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 सामन्यात इंग्लंड महिला अ संघावर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवत शानदार पुनरागमन केले. वानखेडे स्टेडियमवर विजयासाठी 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना उपकर्णधार हॉली आर्मिटेज (52 धावा) आणि यष्टीरक्षक-फलंदाज सेरेन स्मॅली (31 धावा) यांच्यात चौथ्या विकेटसाठी 70 धावांच्या भागीदारीमुळे इंग्लंडचा संघ पूर्ण नियंत्रणात होता.  संधी चांगली दिसत होती पण भारताने पुनरागमन केले आणि सलग फटकेबाजी करत विजयाची नोंद केली.

इंग्लंडने आठ गड्यांच्या मोबदल्यात 131 धावा केल्या. काशवी गौतमने (23 धावांत 2 बळी) 18व्या षटकात स्मॅली आणि इस्सी वाँग (02) यांना बाद करून भारतासाठी पुनरागमनाचे दरवाजे उघडले. यामुळे इंग्लंडला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती ज्यामध्ये श्रेयंका पाटील (26 धावांत 2 विकेट) ने पहिल्याच चेंडूवर पाच अतिरिक्त (वाइड) धावा दिल्या परंतु तरीही भारताला तीन धावांनी विजय मिळवता आला. श्रेयंका महिला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळते, ही टीम विराट कोहलीचीही आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 



[ad_2]

Related posts