( प्रगत भारत । pragatbharat.com)
Uddhav Thackeray : नुकताच देशातील 3 दिग्गजांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) जाहीर झाला. याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) ट्विट करून दिली होती. यावरून उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतं हवीत म्हणून हवं त्यांना भारतरत्न देत आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटंलय. मुंबईत सुरू असलेल्या ठाकरे गटाच्या स्थानिय लोकाधिकार समिती अधिवेशनातून ते कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गोळीबार प्रकरणावरून राज्य सरकारवर देखील निशाणा साधला आहे.
अधिक पाहा..