[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते मात्र आता राष्ट्रावादीत फुट पडली आहे. अजित पवारांसोबत 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या बंडखोरीनंतर आता संजय राऊतांनी सूचक विधान केलं असून महाराष्ट्राला लवकरच नवा मुख्यमंत्री मिळणार आहे, असं ते म्हणाले आहेत. तसेच, हे होणारच होतं, असं सूचक ट्वीटही त्यांनी केलं आहे.
आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.
“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, ‘मी खंबीर आहे. लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.”, असं राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा
[ad_2]