[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>१ ऑगस्ट रोजी प्रदान केल्या जाणाऱ्या लोकमान्य पुरस्काराच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार तब्बल सा़डे आठ वर्षांनी एकाच मंचावर येतायेत. याआधी ते १४ फेब्रुवारी २०१५ रोजी बारामतीमधील कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी आप्पासाहेब पवार सभागृहाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्त झाले होते. त्यानंतर तब्बल जवळपास साडे आठ वर्षांनी असा योग आला आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मूळ राष्ट्रवादी पक्षातून फुटून बाहेर पडलेले अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. म्हणजेच, राष्ट्रवादीत फूट पडल्यावर शरद पवार आणि अजित पवार पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात एका मंचावर असणार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार आहेत. </p>
[ad_2]