Did Rohit Sharma Quit Test Cricket Leadership After Defeat in wtc final 2023 ; पराभवानंतर रोहित शर्माने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडलं का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन : विश्व कसोटी अजिंक्य स्पर्धेत भारताला मानहानीकारक पराभव झाला. या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद सोडले, असे समोर येत होते. कारण रोहितच्या निवृत्तीबाबतचे एक ट्विट समोर आले आहे.

रोहितकडून यावेळी भारतीय चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. गेल्या वेळी भारतीय संघ या फानलमध्ये पोहोचला होता. त्यावेळी विराट कोहली हा कर्णधार होता. त्यावेळी भारताची फे फे उडाली होती. त्यामुळे यावेळी रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असे चाहत्यांना वाटत होते. पण रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही आणि चाहत्यांची निराशा झाली. भारताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तब्बल २०९ धावांनी पराभव पत्करावा लागला. हा पराभव रोहित शर्माच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहितने सामना संपल्यावर कसोटी क्रिकेटचे कर्णधारपद, असे म्हटले जात होते.

rohit sharma

सौजन्य-ट्विटर

आपण कसोटी क्रिकेटचे नेतृत्व सोडत आहोत आणि थोड्या कालखंडानंतर कसोटी क्रिकेटमधून मी निवृत्ती घेणार आहे,असे या ट्विटमध्ये लिहिण्यात आहे. हे ट्विट एका क्रीडा पत्रकाराने पोस्ट केले आहे. हे पत्रकार मोठे जाणकार आहेत आणि सोशल मीडियावर त्यांचे भरपूर फॉलोअर्स आहेत. रोहितने सामन्यानंतर असं म्हटल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पण याबाबत कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहित शर्मा किंवा बीसीसीआय यांनी याबाबतची कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे अनावधाने त्यांच्याकडून ही गोष्ट घडली असावी. पण या एका ट्विटमुळे रोहितच्या नेतृत्वाबाबत जोरदार चर्चा सुरु झाली होती. अजूनही याबाबत चर्चा सुरु आहे. रोहितने याबाबत भाष्य केल्यास या चर्चेला पूर्ण विराम मिळू शकतो. त्यामुळे रोहित शर्मा आता याबाबत आपले मत व्यक्त करणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल. पण या वृत्तामध्ये सध्या तरी काही तथ्य नाही, असेच समोर येत आहे. त्यामुळे या ट्विटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आम्ही करत आहोत.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

(सोशल माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेल्या एका क्रीडा पत्रकारांचे हे ट्विट आहे आणि त्याचा महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम बरोबर काहीही संबंध नाही. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत ही गोष्ट खरी मानू नये आणि या ट्विटचे कोणतेही समर्थन आम्ही करत नाही.)

[ad_2]

Related posts