Amol Kolhe on Ajit Pawar says loyalty is more important than being born walking with the one who holds the finger

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Amol Kolhe on Ajit Pawar : मंत्री दिलीप वळसे पाटील हे आजवर शरद पवारांचे मानसपुत्र मानले गेले. मात्र, आज (21 फेब्रुवारी) दिलीप वळसे पाटलांविरोधात शरद पवार गटाची तोफ धडाडली. आज थेट वळसेंच्या मतदारसंघात पवारांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच सभेतून अजित पवारांकडून शरद पवारांवर कौटुंबिक पातळीवर होत असलेल्या आरोपांचा खासदार अमोल कोल्हे यांनी समाचार घेतला. पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं, अशा शब्दात अमोल कोल्हे अजित पवार यांचा समाचार घेतला. 

अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं 

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्यांनी बलिदान दिली. अनेक वार छाताडावर झेलले, त्यातील प्रत्येकजण छत्रपतींच्या पोटी जन्माला आले नव्हते. त्यामुळं अनेकांना वाटतं की पोटी जन्माला येणं गरजेचं आहे. अहो पोटी जन्माला येण्यापेक्षा निष्ठेने वागणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं पोटी जन्माला येण्यापेक्षा ज्याने बोटाला धरून चालवलं, त्याच्या सोबत चालणं गरजेचं असतं. 

तेव्हाही आव्हान देण्यात आलं 

कोल्हे म्हणाले की, 2019 मध्येही शिरूर लोकसभेत शरद पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं. त्यावेळी मी इथून खासदार झालो. आताही शिरूर लोकसभेसाठी शरद पवारांना आव्हान देण्यात आलं. यावेळी सुद्धा आंबेगावची जनता पुन्हा तोच विश्वास दाखवणार यात शंका नाही, असे ते म्हणाले. दिल्लीतून गुबूगुबू म्हटल्यावर माना डोलवणारे खासदार निवडून द्यायचे की तुमच्या हक्काच्या प्रश्नांसाठी लढा उभारणारे वाघ खासदार म्हणून निवडून द्यायचे हे तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले. 

लय विषय उघडला तर सगळं टोकाला जाईल

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या सभेतून तोफ डागली. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीबाबत लय विषय उघडला, तर सगळं टोकाला जाईल. मुळात आपला पक्ष म्हणजे शरद पवार साहेब आहेत. त्यामुळं तर दिल्ली सुद्धा या नावाला घाबरून असते. त्यांचे डाव आम्ही पाहिले आहेत. ते काय करतील हे कोणीच सांगू शकत नाही. मध्ये कोणीतरी तेल लावून पैलवान तयार होता, त्यांची काय अवस्था केली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. वस्ताद एक डाव मागे ठेवतात, त्यामुळं पवार साहेबांनी शेवटचा एक डाव मागे ठेवला आहे, जो त्या सर्वांना चितपट करेल यात शंका नाही, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. 

त्यावेळीच दिलीप वळसे शरद पवार साहेबांना सोडून जाणार होते का? 

रोहित पवार म्हणाले की, डिंभे – माणिक डोह बोगद्याचा विषय त्यांनी काढला. 20 ऑगस्ट 2018 ला इथून आमदार कोण होतं? दिलीप वळसे पाटील, त्यावेळी सत्ता भाजप-शिवसेनेची होती. तेव्हा एक बैठक झाली, त्या बैठकीत वळसे पाटील, अण्णा हजारे आणि पाचपुते साहेब या तिघांची मंत्र्यांसोबत बैठक झाली. त्यावेळी हा बोगदा करण्यास माझी हरकत नाही, असं पत्र दिलीप वळसेंनी ते पत्र लिहिलं. पाण्याची बचत होणार असेल तर माझी हरकत नाही, पण इथं येऊन काय सांगतात की रोहित पवार पाणी पळवत आहेत, म्हणून मी पवार साहेबांची सत्ता सोडली. आता हे पत्र पाहिल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. मग त्यावेळीच दिलीप वळसे शरद पवार साहेबांना सोडून जाणार होते का? म्हणून आंबेगावच्या जनतेचे पाणी ते देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून द्यायला तयार झाले होते का? परंतु त्यावेळी फक्त पवार साहेबांनी विरोध केला होता. आंबेगावच्या जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय हे करू नका, अशी भूमिका घेतली होती. 

लाव रे तो व्हिडीओ म्हणत दिलीप वळसेंची पोलखोल

दरम्यान, दिलीप वळसेंची पोलखोल करण्यासाठी देवदत्त निक यांनी लाव रे तो व्हिडीओचा फॉर्म्युला अवलंबला. पवार साहेब सांगतील वळसे हे मानसपुत्र की आणखी कोण? असे देवदत्त निकम म्हणाले. देवदत्त निकम याच मतदारसंघातून शरद पवार गटाकडून इच्छूक आहेत. पवार साहेब तुम्ही आमच्या हद्दीत आले की दिलीप वळसे पाटील तुम्हाला चिकटतात. तुमच्या बाजूला बसून गप्पा मारतात, ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि सर्वांना दाखवतात साहेबांसोबत आमचं अजून ही सख्य आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts