[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन मराठा आरक्षणाचा शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली. तसेच त्यांच्याकडून आलेल्या पत्राचा उल्लेख केला. ते म्हणाले की, या पत्रात अर्वाच्य भाषा आणि शिवीगाळ असे लिहिलं आहे ते हास्यास्पद वाटते. हे पत्र मला की सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद घेतात त्यांना लिहिले आहे हे कळू द्या, एक पत्र त्यांना देखील लिहा, कोणती अर्वाच्य भाषा ते वापरतात, असा टोला त्यांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
[ad_2]