[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय संघातील बिग फोर अर्थात कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना वगळले जाऊ शकते. कमीत कमी यातील दोघांना तरी बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. जर असे झाले तर WTC फायनलमधील ८० टक्के टीम इंडिया बदलेल. भारतात मोठ्या प्रमाणात गुणवंत खेळाडू आहेत. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक जण वाट पाहत आहे.
वेस्ट इंडिज दौऱ्यात सरफराज खान, यशस्वी जयसवाल, मुकेश कुमार, अभिमन्यू ईश्वरन, जीतेश शर्मा, प्रियांक पांचाल, बाबा इंद्रजीत या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्या बरोबर हनुमा विहारीला देखील स्थान मिळू शकते. काही खेळाडू दुखापतीमुळे सध्या संघाबाहेर आहेत, त्यापैकी ऋषभ पंत, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांचा देखील फिटनेसवर विचार केला जाईल.
भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिक म्हणाला, संघातील ज्या खेळाडूंचे वय ३० किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांच्या समावेशाबाबत विचार केला जाऊ शकतो. याचा निर्णय कोच राहुल द्रविड यांना घ्यावा लागणार आहे. काही युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. यात यशस्वी, सरफराज आणि मुकेश कुमार यांचे नाव आघाडीवर आहे. एकूणच WTC फायनलनंतर भारतीय संघात बदलाचे वारे वाहत असल्याचे दिसत आहे.
[ad_2]