[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
लंडन : WTC Final मध्ये आयसीसीकडून एक चुकही घडली. या चुकीचा खरपूस समाचार रोहित शर्माने घेतला आहे. रोहित शर्माने यावेळी फक्त एकाच वाक्यात आयसीसीची बोलती बंद केली आहे. आयसीसी ही सर्वोच्च संस्था आहे. पण त्यांच्या सामन्यांपेक्षा आयपीएल बरी, असा टोला आता रोहितने लगावला आहे. रागाच्या भरात रोहित असं नेमकं काय म्हणाला, याचे कारणही आता समोर आले आहे.भराताला विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताला पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर आयसीसीने भारतीय संघावर १०० टक्के दंड ठोठवला. पण यावेळी आयीससीकडून मोठी चूक घडली. भारतीय संघ विजयाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झाला होता. भारताची सुरुवात चांगली झाली होती. रोहित शर्मा धडाकेबाज फटकेबाजी करत होता. रोहितला शुभमन गिल चांगली साथ देत होता. पण त्याचवेळी गिलला चुकीच्या पद्धतीने पंचांनी बाद दिले. त्यानंतर रोहित शर्मा आयसीसीवर चांगलाच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर फक्त एका वाक्यात रोहितने आयसीसीवर तोफ डागली आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, ” शुभमन गिलला ज्या पद्धतीने बाद दिले ते दुर्देवी आहे. आयपीएलमध्ये एकाच वेळेला १० कॅमेरे त्यांच्या वेगवेगळ्या अँगलसह तयार असतात पण या आयीससीच्या फायनलमध्ये मात्र हा झेल घेतला की नाही, हे पाहण्यासाठी जास्त कॅमेरे आणि अँगल्स नव्हते. या गोष्टीचा फटका नक्कीच भारतीय संघाला बसला आहे.” आयपीएल ही बीसीसीआय आयोजित करत असते, तर WTC Final आयसीसी. क्रिकेट विश्वात आयसीसी ही सर्वोच्च संस्था आहे. पण सर्वोच्च संस्था जरी आयसीसी असली तरी त्यांच्याकडे बीसीसीआयसारखे साधनं नाहीत आणि याचा फटका संघासहीत खेळाडूंना बसत आहे, हे रोहितने एका वाक्यात विषद केले आहे. त्यामुळे एकाच वाक्यातच रोहितने यावेळी आयसीसीचे तोंड बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे.
रोहित शर्मा म्हणाला की, ” शुभमन गिलला ज्या पद्धतीने बाद दिले ते दुर्देवी आहे. आयपीएलमध्ये एकाच वेळेला १० कॅमेरे त्यांच्या वेगवेगळ्या अँगलसह तयार असतात पण या आयीससीच्या फायनलमध्ये मात्र हा झेल घेतला की नाही, हे पाहण्यासाठी जास्त कॅमेरे आणि अँगल्स नव्हते. या गोष्टीचा फटका नक्कीच भारतीय संघाला बसला आहे.” आयपीएल ही बीसीसीआय आयोजित करत असते, तर WTC Final आयसीसी. क्रिकेट विश्वात आयसीसी ही सर्वोच्च संस्था आहे. पण सर्वोच्च संस्था जरी आयसीसी असली तरी त्यांच्याकडे बीसीसीआयसारखे साधनं नाहीत आणि याचा फटका संघासहीत खेळाडूंना बसत आहे, हे रोहितने एका वाक्यात विषद केले आहे. त्यामुळे एकाच वाक्यातच रोहितने यावेळी आयसीसीचे तोंड बंद केल्याचे पाहायला मिळाले आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंत अशा कोणतीही घडना घडली नाही की, तांत्रिक गोष्टींमुळे चुकीचा निर्णय देण्यात आला आहे. पण या फायनलमध्ये मात्र टर्निंग पॉइंटच आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे घडला आहे.
[ad_2]