[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
ABP Majha C Voter Opinion Poll : आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील कोणत्या पक्षाच्या किती जागा निवडून येणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्रपक्षांनी ‘मिशन 45’ चा नारा दिला होता. मात्र, एबीपी माझा आणि सी व्होटर्सच्या ओपिनियन पोलनुसार, महायुतीचे ‘मिशन 45’ सपशेल भंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. कारण आगामी ओपिनियन पोलनुसार, भाजप आणि मित्रपक्षांना म्हणजेच एनडीएला महाराष्ट्रात केवळ 28 जागांवर विजय मिळवता येऊ शकेल.
[ad_2]