भारतीय जनता पार्टी म्हणजे खंडणी गोळा करणारी टोळी; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uddhav Thackeray On BJP  : निवडणूक रोख्यांची (Electoral Bonds) यादीवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. भारतीय जनता पार्टी म्हणजे खंडणी गोळी करणारी टोळी असल्याचं म्हणत ठाकरेंनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे आजपासून दोन दिवसीय हिंगोली दौऱ्यावर असून, आपल्या पहिल्याच सभेत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. 

यावेळी आपल्या भाषणात बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “यांना घरफोडीचे अधिकृत परवाना दिला पाहिजे. तसेच, कमळाचे चिन्हाच्या जागी त्यांना हातोडा चिन्ह दिले पाहिजे घरफोडीसाठी, भाजप आता शासकीय यंत्रणा वापरून खंडणी गोळा करणारा पक्ष झाला आहे. सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा मग पाहा जनता काय करते. तुम्ही म्हणायचे ‘अच्छे दिन आयेंगे, पण आता सच्छे दिन आयेंगे’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts