[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली: भारताचा माजी क्रिकेटपटू हल्ली कायमच चर्चेचा विषय बनला आहे. आयपीएलपासून गौतम गंभीर हे नाव बरेचदा ऐकू येत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभवानंतर त्याने भारतीय खेळाडू आणि बीसीसीआयची पण चांगलीच कानउघाडणी केली. पण त्यानंतर आता गंभीर असे काही वक्तव्य केले आहे ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. गौतम गंभीरने पान मसालाच्या जाहिराती करणाऱ्या क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे. IPL 2023 च्या नुकत्याच संपलेल्या १६व्या हंगामादरम्यान, काही खेळाडूंनी पान मसालाची जाहिरात केली होती ज्यात सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग असे बडे खेळाडू शामिल होते. यांच्यावर आता गंभीरने चांगलाच निशाणा साधला आहे.पण यादरम्यान त्याने कोणाचेही नाव घेतले नाही ना कोणताही उल्लेख केला.न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत गौतम गंभीर म्हणाला, “मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की एखादा क्रिकेटर पान मसालाची जाहिरात करेल. हे घृणास्पद आणि निराशाजनक आहे. म्हणूनच मी म्हणतो की तुमचे आदर्श हुशारीने निवडा. तुम्ही कोणते उदाहरण मांडत आहात? तो पुढे म्हणाला, “एखादी व्यक्ती त्याच्या नावाने नाही, तर त्याने केलेल्या कामावरून ओळखली जाते. करोडो मुलं तुम्हाला पाहत आहेत. पैसा इतका महत्त्वाचा नाही की तुम्ही पान मसाल्याची जाहिरात कराल. पैसे कमवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. अशा गोष्टी करण्यापेक्षा मोठ्या पैशांचा धनादेश नाकारण्याचे धाडस दाखवले पाहिजे.”
या डावखुऱ्या फलंदाजाने सांगितले की, २०१८ मध्ये जेव्हा त्याने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद सोडले होते, तेव्हा त्याला पान मसालाच्या जाहिरातीत काम करण्यासाठी ३ कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती परंतु त्याने हा करार नाकारला होता.
गंभीर असेही म्हणाला, “मी पैसे घेऊ शकलो असतो, पण मी ते सोडले कारण मला नेहमी वाटते की मी ज्यासाठी पात्र आहे ते मला मिळाले पाहिजे. सचिन तेंडुलकरला पान मसालाच्या जाहिरातींमध्ये दिसण्यासाठी २०-३० कोटी रुपयांची ऑफरही देण्यात आली होती. पण त्यांनी या पान मसाला जाहिरातींना नाही म्हटले. त्यांनी आपल्या वडिलांना वचन दिले की ते अशा गोष्टींमध्ये कधीच गुंतणार नाहीत, म्हणूनच तो एक आदर्श आहे.”
[ad_2]