[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
जालना (आंतरवाली सराटी) : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी सगेसोयरे कायद्याची अमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आज मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवाली सराटीमध्ये (Antarwali Sarathi ) महत्वाची बैठक बोलावली आहे. दरम्यान, या बैठकीला सुरवात झाली आहे. बैठकीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत असून, सर्वत्र भगवं वादळ पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे भाषणाला उठताच पाटील पाटील पाटील अशा घोषणांनी परिसर दणाणले.
यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी बैठक आहे. आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. सहा महिन्यापूर्वीचे गुन्हे आता दाखल करत आहेत. त्यावेळी तुम्ही झोपले होते का?, एवढी नाराजी समाजाची घेण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गरज नव्हती. हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहात असे जरांगे म्हणाले.
आता मराठे थांबणार नाही…
यवतमाळचे पोलीस महिलांना बसून ठेवत आहे. आंतरवाली सराटीला जाऊ नयेत म्हणून अडवले जात आहे. मात्र, मराठे नाही थांबणार, तुम्हाला घरी बसवतील. मी भावनेच्या आहारी बोलत नाही, राजकारण माझा मार्ग नाही. मी गोरगरीब मराठ्यांना मोठं करत असतो. मराठा समाजावर तुम्ही असा अन्याय करणार असाल, स्वतःच्या आई-बहिणी एवढी तुम्हाला इतरांच्या आई-बहिणीबाबत मया आली पाहिजे होती, असे म्हणत जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला.
अधिक पाहा..
[ad_2]