[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>शिवसेनेचा दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिकवर दावा कायम ठेवलाय. इच्छुक उमेदवारांची नावे शिवसेनेनं भाजपकडे पाठवली आहेत. या चारही जागांवर महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. शिवसेनेने दक्षिण मुंबई, ठाणे, शिर्डी आणि नाशिक या चार जागांवरील इच्छुक उमेदवारांची नावे भाजपकडे पाठवण्यात आल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या चारही जागा जिंकण्यासाठी लागणारे समीकरण आणि योग्य उमेदवार शिवसेनेकडे आहेत असा युक्तिवाद महायुतीत करण्यात आला.</p>
[ad_2]