BCCI Slams Pakistan About Asia Cup 2023 ; बीसीसीआयने कसा केला पाकिस्तानचा डबल गेम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : आशिया चषकासाठी घोषणा झाली आणि त्यानंतर एक गोष्ट समोर आली. ही गोष्ट म्हणजे बीसीसीआयने पाकिस्तानचे दुहेरी नुकसान केले असून एकाच दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला बीसीसीआयने नामोहरम केल्याचे पाहायला मिळाले आहे.
बीसीसीआयने पाकिस्तानचा कसा केला डबल गेम, जाणून घ्या…
आशिया चषक ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयजित होणार होती. पण बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. त्यानंतर भारत जर पाकिस्तानात येणार नसेल तर आम्ही तिथे जाऊन वनडे वर्ल्ड कप खेळणार नाही, असा पवित्रा पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने घेतला होता. पण आता बीसीसीआयने पाकिस्तानला एकाचवेळी दोन धक्के दिले आहेत. कारण आता आयसीसीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार होणार आहे, हे स्पष्ट केले आहे. या गोष्टीचा पहिला धक्का पाकिस्तानला असा बसला आहे की, आता त्यांच्या देशात फक्त चारच सामने होणार आहे. त्याचबरोबर अंतिम फेरीचा सामनाही त्यांच्या देशात होणार नाही. संयुक्ती अरब अमिरातीमध्ये खेळण्याचा प्रस्तान पाकिस्तानने भारताला दिला होता, पण तो प्रस्ताव नाकारण्यात आला असून आता हे सामने श्रीलंकेत होतील. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे श्रीलंकेत अंतिम फेरीसह ११ सामने होणार आहेत आणि पाकिस्तान यजमान असूनही त्यांच्याकडे फक्त चार सामने होतील. हा त्यांच्यासाठी पहिला धक्का आहे. त्यानंतर या आशिया चषकाच्या घोषणेसह पाकिस्तान आता भारतामध्ये वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकाच बाणाने बीसीसीआयने पाकिस्तानची दोनदान शिकार केली आहे. त्यामुळे आता भारत पाकिस्तानात क्रिकेट खेळायला जाणार नाही, पण त्यांना मात्र भारतात विश्वचषकासाठी यावे लागणार आहे. त्यामुळे आता पाकिस्तान बीसीसीआयपुढे नमल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

आशिया चषक स्पर्धेबाबत आज आयसीसीने घोषणा केली आहे. त्यामुळे आता ३१ ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता ही स्पर्धा कोणता संघ जिंकतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts