Raj Thackeray MNS Gudi Padwa Melava shivaji park speech memes on social media maharashtra lok sabha election marathi news 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: राज्याच्या राजकारणात एवढं काही घडत असताना एक कणखर नेतृत्व समजले जाणारे राज ठाकरे काहीतरी ठोस भूमिका घेतील, काहीतरी ठाम भूमिका घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना उर्जा देतील, त्यांना पुन्हा एकदा सक्रिय करतील अशी अनेकांना आशा होती. मनसेच्या स्थापनेच्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये जो जोश होता तो पुन्हा निर्माण करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. पण मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरेंनी आपण निवडणूक लढणार नाही, आपल्याला राज्यसभा नको ना विधानपरिषद, आपण नरेंद्र मोदींनी बिनशर्त पाठिंबा देणार (Raj Thackeray Supports Narendra Modi) असं जाहीर केलं आणि बहुतांश कार्यकर्त्यांचा हिरमोड झाल्याचं दिसलं. 

राज ठाकरे गुढी पाडव्याच्या मेळाव्यात कुणाला धारेवर धरणार हे ऐकायला महाराष्ट्रभरातून त्यांचे कार्यकर्ते आले होते. पण आपण लोकसभा निवडणूक लढणार नाही, विधानसभेच्या तयारीला लागा असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. त्यानंतर त्यावर सोशल मीडियातून प्रतिक्रियांचा पाऊस सुरू झाला.

नेते म्हणाले, हिंदुत्वासाठी भाजपसोबत जायला अडचण नाही

नेते म्हणत होते की हिंदुत्वासाठी महायुतीसोबत जायला काही हरकत नाही, पण कार्यकर्ते मात्र वेगळाच विचार करत होते. अनेक कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी ‘एकला चरो रे’ अशी भूमिका घ्यावी आणि सत्ताधारी तसेच विरोधकांना अंगावर घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर मात्र कार्यकर्त्यांमध्ये काहीसा संभ्रम झाल्याचं दिसलं.

नेटकरी काय म्हणाले? 

राज ठाकरेंच्या नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देण्याच्या भूमिकेवर सोशल मीडियातून मोठ्या प्रतिक्रिया आल्या. त्यामध्ये बहुतांश लोकांना राज ठाकरेंची ही भूमिका पटली नसल्याचं सांगितलं. अनेकांनी तर त्यावर मीम्सही तयार केले. त्यापैकी काही कमेंट्स पाहिल्यानंतर लोकांचा कल काय होता ते लक्षात येईल, 

– वसंत मोरेंनी योग्य निर्णय घेतला. 
– अशी भूमिका घ्या की आपलेच कार्यकर्ते नाही तर समोरचे कार्यकर्तेही संभ्रमात पडले पाहिजेत. 
– भूमिका अशी घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजेत.
– फक्त एक ईडीच्या नोटीसने उभा महाराष्ट्र सरळ करणारा माणूस स्वतः सरळ झालाय. 
– यासाठी एवढी मोठी सभा घ्यायची मग गरज होती का? एक ट्विट टाकला असता तरी चालल असत, आणि हे अपेक्षित होतं.
– हे तर एक पत्रक काढून सांगता येत होते.
– शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, मणिपूर, महागाई, electoral bonds, शेतकरी आंदोलन, भ्रष्टाचाऱ्यांना प्रवेश इत्यादीसाठी बिनशर्त पाठिंबा. 

राज ठाकरेंनी सर्वकाही सांगितलं, पण संधी असताना आणि महायुती जागा देत असतानाही लोकसभा निवडणूक का लढली नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फक्त भाजपच्या मोदींसाठी आपण शिवसेना-राष्ट्रवादीचा सहभाग असलेल्या महायुतीला का पाठिंबा देतो हेदेखील फोडून सांगता आलं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि लोकांमध्ये काहीसा संभ्रम असल्याचंही बोललं जातंय.

त्यामुळे लोकसभा निवडणूक लढणार नाही, फक्त मोदींसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची सेना आणि भाजप असलेल्या महायुतीला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंची भूमिका नेटकऱ्यांना मात्र पटली नसल्याचं दिसतंय. 

ही बातमी वाचा: 

MNS Sainik Sangli : सांगलीचा मनसैनिक चुकला, म्हणाला, मी चंद्रहार पाटलांचा प्रचार करणार

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts