Eknath Shinde Statement About Shasan Aplya Dari Program In Pune

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Eknath shinde : आधीचं सरकार घरी होतं, आमचं सरकार लोकांच्या दारी जातंय, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेवर उत्तर दिलं आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमात अतोनात खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून मागील काही दिवसांपासून करण्यात येत होता. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुण्यात आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच कार्यक्रमांवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.  

राज्यातील अनेक नागरिकांना शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे लाभ होत आहे. त्यांना एकाच छताखाली सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत आहोत. 

[ad_2]

Related posts