If Chhatrapati Udayanraje stands from BJP I will not vote for him But the respect for his throne will not decrease even for a moment says kiran mane shahu maharaj kolhapur satara

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kiran Mane on Udayanraje Bhosale : करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या दत्तक विधानावरून वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोल्हापूरचे शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक अडचणीत आले आहेत. त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर कोल्हापूरसह शाहू प्रेमी जनतेमध्ये संतापाची लाट पसरली आहे. इतिहास संशोधकांनी सुद्धा संजय मंडलिक यांना केलेल्या वक्तव्यावरून धारेवर धरत विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. 

छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही

या सर्व पार्श्वभूमीवर आता अभिनेता किरण माने यांनी आपल्या भावना सोशल मीडियातून व्यक्त करताना कोल्हापूर आणि सातारा महाराष्ट्रातील काळजाचा विषय असल्याचे म्हटले आहे. गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी ट्विट करून कोल्हापुरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला, असे म्हटले आहे. तसेच छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही, असे म्हटले आहे. 

किरण माने आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.. 

कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी.

परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला !

ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही.

मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय… ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली… ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं… त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले… त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???

यांचे ‘बोलविते धनी’ वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका. 

कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts