[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : भारतामध्ये आता ODI World Cup होणार आहे आणि पाकिस्तानने या स्पर्धेसाठी आपला होकार कळवला आहे. त्यामुळे आता पाकिस्तान हा विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार आहे. पण आता या विश्वचषकाबाबत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.आफ्रिदी जेव्हा पाकिस्तानचा कर्णधार होता तेव्हाही भारतामध्ये विश्वचषक झाला होता आणि त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारतामध्ये खेळण्यासाठी आला होता. २०११ साली झालेल्या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोणीही विसरू शकणार नाही. कारण या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले होते आणि त्यांनी अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यामुळे हा सामना कोणीही विसरू शकणार नाही. आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात या विश्वचषकात सामना होणार आहे. हा सामना अहमदाबादमध्ये होणार असल्याचे संकेत मिळत आहेत, पण पाकिस्तानचा मात्र या ठिकाणाला विरोध आहे.
आफ्रिदी यावेळी म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे विश्वचषकातील सामना हा अहमदाबाद येथे खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. पण पाकिस्तानने मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. मला पाकिस्तान क्रिकेट मंडळाची एक गोष्ट कळत नाही, ती म्हणजे अहमदाबादच्या खेळपट्टीला ते एवढे का घाबरत आहेत. अहमदाबादच्या खेळपट्टीमधून काही आग येते का? अहमदाबादची खेळपट्टी घाबरवणारी आहे का? खेळायला जायचं आणि जिंकून यायचं, हेच संघाने करायचं असतं. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीला सकारात्मकपणे घेतले पाहिजे. सर्वात महत्वाचे काय आहे, तर विजय मिळवणे. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला तर नक्कीच या गोष्टी महत्वाच्या ठरणार नाहीत. त्यामुळे माझ्यामते तरी पाकिस्तानने या गोष्टीला विरोध करू नये.”
आफ्रिदी यावेळी म्हणाला की, ” भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वनडे विश्वचषकातील सामना हा अहमदाबाद येथे खेळवण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. पण पाकिस्तानने मात्र या गोष्टीला विरोध केला आहे. मला पाकिस्तान क्रिकेट मंडळाची एक गोष्ट कळत नाही, ती म्हणजे अहमदाबादच्या खेळपट्टीला ते एवढे का घाबरत आहेत. अहमदाबादच्या खेळपट्टीमधून काही आग येते का? अहमदाबादची खेळपट्टी घाबरवणारी आहे का? खेळायला जायचं आणि जिंकून यायचं, हेच संघाने करायचं असतं. पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने या गोष्टीला सकारात्मकपणे घेतले पाहिजे. सर्वात महत्वाचे काय आहे, तर विजय मिळवणे. पाकिस्तानने या सामन्यात विजय मिळवला तर नक्कीच या गोष्टी महत्वाच्या ठरणार नाहीत. त्यामुळे माझ्यामते तरी पाकिस्तानने या गोष्टीला विरोध करू नये.”
या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना गुजरातला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. पण आता आफ्रिदीने स्पष्टपणे त्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे क्रिकेट मंडळ काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.
[ad_2]