Rohit Sharma And Virat Kohli’s Future Will Decide Who Has Not Played Single International Match ; रोहित-कोहलीचा निर्णय एकही आंतरारष्ट्रीय सामना न खेळणारा खेळाडू घेणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : बीसीसीआयचं नेमकं चाललंय तरी काय, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. कारण एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणाऱ्या खेळाडूला बीसीसीआयने चक्क निवड समितीमध्ये स्थान दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळो रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याचा निर्णय एकही आंतरराष्ट्रीय सामना न खेळणारा खेळाडू घेणार असल्याचे आता समोर आले आहे.भारताच्या पराभवानंतर आता एकामागून एक भारतीय संघाबाबतच्या भयावह गोष्टी समोर येत आहेत. एकेकाळी निवड समितीमध्ये दिग्गज खेळाडू असल्याचे पाहायला मिळत होते आणि त्यावेळी भारताची कामगिरी चांगली होत होती. पण आता बीसीसीआयने अशा एका खेळाडूला निवड समितीमध्ये आणले आहे की, ज्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. पण एकही सामना न खेळता हा खेळाडू आता चक्क विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भवितव्याचा निर्णय घेणार असल्याचे समोर येत आहे.

तामिळनाडूचा माजी क्रिकेटपटू श्रीधरन शरथने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्याने १३९ प्रथम श्रेणी आणि ११६ लिस्ट ए सामने खेळले आहेत. तमिळनाडूसाठी १०० रणजी सामने खेळणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. या निवड समितीतील तो एकमेव खेळाडू आहे ज्याला टीम इंडियाकडून खेळण्याचा अनुभव नाही. त्याचबरोबर टी-२० आंतरराष्ट्रीय खेळाचा अनुभव कोणालाच नाही. तरीही श्रीधरन हा भारतीय संघाच्या निवड समितीमध्ये आहे. त्यामुळे आता श्रीधरनवर टीका होत असली तरी बीसीसीआय त्यासाठी जबाबदार असल्याचे समोर येत आहे. कारण निवड समिती गठीत करण्याचा निर्णय हा बीसीसीआय घेत असते. त्यामुळे आता बीसीसीआयवर चौफेर टीका होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीसीसीआय आता याबाबत पुढे कोणतं पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

बीसीसीआयने निवड समितीबाबत काही नियम बनवले होते. पण त्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर येत आहे. कारण जो खेळाडू एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही त्याला निवड समितीमध्ये स्थान कसे दिले, असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

[ad_2]

Related posts