IND vs WI दौऱ्याबाबत रोहित शर्माबद्दल मोठे अपडेट, पुजाराला संघात पुन्हा मिळणार संधी कारण…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय संघ सध्या विश्रांती करत आहे. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना खेळाडूंचे विविध फोटो समोर येत आहे. तर जे खेळाडू दुखापतग्रस्त होते ते खेळाडू आता पुनरागमनासाठी जोशात तयारी करत असून फिट होण्याकडे त्यांचा कल आहे. या विश्रांतीनंतर आता भारताला वेस्ट इंडिज दौरा करायचा आहे. ज्यामध्ये २ कसोटी, ३ वनडे आणि ५ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी आणि दौऱ्यासाठी भारताचा नियमित कार्डंहार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यात यांच्या बातम्या जोर धरून होत्या. पण आता यावर पूर्णविराम बसला आहे. रोहित शर्माबद्दल आता मोठी अपडेट समोर येत आहे.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपक अंतिम समान सलग दुसऱ्यांदा वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी (India Tour Of West Indies 2023) निवड प्रक्रियेसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे. वास्तविक, रोहित शर्माला कसोटी मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते, असे बोलले जात होते. तसेच, त्याच्या जागी तात्पुरत्या स्वरूपात स्टँडबाय कर्णधारपॅड दुसऱ्या कोणाला तर दिले जाऊ शकते. पण, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या अफवांचे खंडन केले आहे. तर वाईट बातमी अशी आहे की केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह हे तिघेही दुखापतीतून बरे झाले नसल्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध नसणार आहेत. अशा स्थितीत चेतेश्वर पुजाराचे स्थान कायम राहण्याची खात्री आहे.

पुजाराची उपस्थिती असली तरी दोन कसोटी सामन्यांसाठी सर्फराज खानसारख्या खेळाडूचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेऊ शकतात. रणजी ट्रॉफीत धावांचा पाऊस पाडणारा सरफराज दार ठोठावत आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “रोहित फिट आहे आणि निवडीसाठी उपलब्ध आहे. त्याचा ब्रेक चांगला होता. त्यामुळे वर्कलोड मॅनेजमेंटचीही चिंता नाही. तो वेस्ट इंडिज मालिकेत नेतृत्व करेल.

मुंबई इंडियन्सच्या प्लेअर्सनी गायलं कैलाश खेरचं गाणं

रोहित शर्मा काही काळ कसोटी क्रिकेटमधून ब्रेक घेणार की नाही, अशी चर्चा सुरू आहे. त्याचा खराब फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. पण २०२३ च्या विश्वचषकाला अवघे काही महिने बाकी असताना, विंडीज मालिका हे महत्त्वाचे व्यासपीठ ठरू शकते जिथे तो फॉर्ममध्ये परत येईल. मात्र, आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये अपयशी ठरल्यानंतरही रोहितची आकडेवारी काही औरच सांगते. गेल्या १२ महिन्यांत एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची सरासरी ४९.२७ आहे. त्याने १३ डावात एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. त्याने १११.५२ चा स्ट्राईक रेटही गाठला आहे. कसोटीत त्याची सरासरी केवळ ५ सामन्यात ३७.५ आहे. त्याचवेळी, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते, त्याच्या फॉर्मवर टीका करणे खूप घाईचे आहे.

पुढे ते म्हणाले; रोहितने आयपीएल आणि डब्ल्यूटीसी फायनलमध्ये जास्त धावा केल्या नाहीत. पण गेल्या काही महिन्यांत त्याने चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात त्याने शतक झळकावले. तो त्याच्या फिटनेसची काळजी घेत आहे. फॉर्मच्या आधारे त्याच्यावर टीका करणे कठोर आहे.

[ad_2]

Related posts