Big Update About World Cup 2023 ; बीसीसीआयने धक्का दिल्यावर पाकिस्तानचे आयसीसीला पत्र

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता पाकिस्तानने आपला मोर्चा आयसीसीकडे वळवला आहे. पाकिस्तानने आता आयसीसीला एक पत्र लिहिले आहे आणि त्यानंतर वर्ल्ड कपबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान रंगणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या ठिकाणांबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हरकती संपण्याचे नावच घेत नाहीत. आता पाकिस्तान बोर्डाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलकडे (आयसीसी) नवी मागणी केली आहे. ‘आपल्याला अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामना नको’, असे पाकिस्तान बोर्डाने आयसीसीला पत्राद्वारे कळविले आहे. ‘आमचा सराव सामना बिगरआशियाई संघाविरुद्ध असावा’, असेही पाकिस्तानने पत्रात नमूद केले आहे. वनडे वर्ल्ड कपआधी होणाऱ्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध लढती होणार असल्याने पुन्हा वर्ल्ड कप सराव सामन्यात त्याच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामना नको, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानातील जिओ न्यूजच्या सुत्रांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने आयसीसीला तसे पत्र लिहून कळविले आहे.

पाकिस्तानचा अन्य मागण्या आहेत तरी काय, जाणून घ्या…
-वनडे वर्ल्ड कपच्या प्रस्तावित कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध लढतींची ठिकाणे बदलण्याची मागणी केली आहे.
-प्रस्तावित कार्यक्रमानुसार ऑस्ट्रेलियाविरुद्धची लढत बेंगळुरूत, तर अफगाणिस्तानविरुद्धचा सामना चेन्नईत अपेक्षित आहे. मात्र पाकिस्तानला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, तर बेंगळुरूत अफगाणिस्तानविरुद्ध लढत हवी आहे.
-फिरकीला पोषक असणाऱ्या चेन्नईच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानचा सामना करणे म्हणजे पराभव ओढवून घेण्यासारखे आहे, असे पाकिस्तानला वाटते.
-रशिद खान आणि नूर अशा प्रभावी स्पिनरचा सामना पोषक खेळपट्टीवर खेळणे पाकिस्तानला टाळायचे आहे.
-भारताविरुद्धची अहमदाबादमधील लढतही पाकिस्तानला पटलेली नाही. मात्र या स्पर्धेतील लढतीचे महत्त्व आणि बीसीसीआयला अहमदाबादबद्दल वाटणारी ‘आपुलकी’ यामुळे पाकिस्तानने अहमदाबादबद्दल हरकत नोंदवणे टाळले आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

-‘आमच्या लढती लखनऊला घेतल्या तरी चालतील. दिल्ली हे ठिकाणही इतर संघांप्रमाणे आम्हाला सोयीस्कर वाटते. आमची इंग्लंडविरुद्धची लढत लखनऊ किंवा चेन्नईत व्हावी, असेही आम्हाला वाटते’, असे पीसीबीने आयसीसीला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

[ad_2]

Related posts