Why Gautam Adani Clicks Photo With 1983 World Cup Winning Team On Adani Day; गौतम अदानींनी का काढला १९८३ साली वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमसोबत फोटो?

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अहमदाबाद: ४० वर्षांपूर्वी हॉकीचे वेड असलेल्या देशात क्रिकेटचे नवे पर्व सुरू झाले. जेव्हा भारतीय संघाने इंग्लंडमधील ऐतिहासिक मैदान असलेल्या लॉर्ड्सवर कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकला होता. दोन वर्षांपूर्वी जगाचा निरोप घेतलेल्या यशपाल शर्मा यांच्याशिवाय त्या १४ सदस्यीय विजेत्या संघातील प्रत्येक सदस्य काही दिवसांपूर्वी झालेल्या सत्कार समारंभाला उपस्थित होते. निमित्त होते देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ६१ व्या वाढदिवसाचे. हे सर्व दिग्गज गुजरातमधील सर्वात मोठे शहर अहमदाबाद येथे एका खास मिशनसाठी जमले होते.अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी २०२३ क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाच्या समर्थनार्थ ‘जीतेंगे हम’ ही मोहीम सुरू केली. पोर्ट्स-टू-एनर्जी ग्रुपने २४ जून रोजी १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघाच्या दिग्गजांना एकत्र बोलावले होते. कर्णधार कपिल देव, उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, यष्टिरक्षक सय्यद किरमानी, रॉजर बिन्नी, मदन लाल, संदीप पाटील, बलविंदर सिंग संधू, कृष्णमाचारी श्रीकांत, दिलीप वेंगसरकर, सुनील व्हॅल्सन हे दिग्गज क्रिकेटपटू उपस्थित होते.

भारतीय क्रिकेट चाहत्यांना एकत्र करण्यासाठी #JeetengeHum सह ट्विटर आणि Instagram वर मोहीम सुरू करण्यात आली. यादरम्यान अध्यक्ष गौतम अदानी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘क्रिकेट ही आपल्या देशातील भावनांच्या विस्तृत स्पेक्ट्रममध्ये जोडणारी शक्ती आहे. कथा घडत नाहीत तर मेहनत आणि चिकाटीने समोर येतात. टीम इंडियामध्ये हे दोन्ही गुण असले पाहिजेत, ज्यामुळे आम्हाला १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकता आला.

रोहित पवारांकडून अदानींच्या गाडीचं सारथ्य; बारामतीच्या पॉवरफुल कार्यक्रमाची जोरदार चर्चा

विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार कपिल देव यांनी गौतम अदानी यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. ते म्हणाले, आमच्या विजयाच्या आठवणी आम्ही तुमच्यासोबत साजरी करत आहोत. तुम्ही जसा तुमचा वाढदिवस साजरा केला, तसाच आम्ही दरवर्षी आमच्या विजयाचा वाढदिवस २५ जून रोजी एकत्र येऊन साजरा करतो. तुम्ही आम्हाला तुमच्या या सेलिब्रेशनमध्ये आमंत्रित करत थोडा वेळ घालवण्याची संधी दिली, खूप छान वाटलं. “हे कालच घडल्यासारखं वाटतंय. कधी कधी काही गोष्टी विसरायच्या असतील तर लोक त्या विसरु देत नाहीत. आपला वाढदिवस कोणीही विसरत नाही, पण इतरांना आपला वाढदिवस आठवला तर आणखी छान वाटते.

[ad_2]

Related posts